नवी दिल्ली - राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांच्यावर काही दिवसांपूर्वीच किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया पार पडली. लालू यादव यांना त्यांच्या मुलीनेच किडनी दिली आहे. अनेक दिवसांपासून ते आजारी होती. मात्र शस्त्रक्रियेनंतर लालू यादव परतले असून त्यांनी परत येताच मोदी सरकारवर कडाडून टीका केली.
लालू यादव म्हणाले की, देशात गरीब, बेरोजगारी, हुकूमशाही शिगेला पोहोचली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जे सांगेल तेच नरेंद्र मोदी करत आहेत. कोणाचा सन्मान नाही करत. संविधानाची उपेक्षा करत आहे. आपण सगळे एकत्र येऊन, देशाला वाचविण्यासाठी, लोकशाही वाचविण्यासाठी लढू. भारताला कोणीही तोडू शकत नाही, असंही लालू यांनी म्हटलं.
ते पुढं म्हणाले की, बिहारमध्येच आरएसएसच्या रथाला रोखलं होतं. बिहार जेव्हा निर्णय घेतो, तेव्हा देशातील हवा बदलते. बंच ऑफ थॉटमध्ये दोन भयंकर गोष्टी लिहिल्या आहेत. त्यात काशीविश्वनाथ मंदिरात कोणी दलित गेला तर त्याला ठार करायला हवं. तसेच देशातील आरक्षण बंद करायला हवं, असंही त्यात असल्याचं म्हटलं.
बिहारमधील आघाडी विचारधारेचा आहे. देशात लोकशाही वाचली तरच आपल्याला राजकारण करता येईल. २०२४ आणि २०२५ मध्ये आपल्याला नवा विक्रम करायचा, अस आवाहनही लालू यादव यांनी केली. मला माझी मुलगी रोहिनी हिने किडनी देऊन नवीन जीवन दिलं आहे. तिचे खूप-खूप आभार. तिने मला नवा
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.