कर्जमाफीतील ८८ कोटी ९९ लाख जमा
राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत जिल्ह्यातील १२ हजार ९१४ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या टप्प्यात ८८ कोटी ९९ लाख रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली. सर्वाधिक ११ हजार १९८ शेतकऱ्यांचे ७३ कोटी ४१ लाख रुपये जिल्हा बँकेत जमा झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने योजनेस आज सुरुवात झाली.