कोणत्या हंगामात काय पिकतं हे तरी माहिती आहे का?, नक्वींचा राहुल गांधींना टोला

mukhtar abbas naqvi rahul gandhi.jpg
mukhtar abbas naqvi rahul gandhi.jpg

नवी दिल्ली- पंजाबमध्ये ट्रॅक्टर रॅलीदरम्यान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सत्ता येताच कृषी कायदा कचऱ्यात टाकू असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी समाचार घेतला आहे. तुम्हाला वाटेल तेव्हा संसदेत संमत झालेलं विधेयक लोकांसमोर फाडायला हे मम्मीजी किंवा मनमोहनजींचे सरकार नाही, हे कोणीतरी पप्पूला सांगितले पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला आहे. 

हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार आहे. जे शेतकरी, गरीब आणि समाजातील उपेक्षित वर्गांसाठी विश्वासाने काम करते. अशा पद्धतीच्या राजकीय ढोंगीपणासाठी आमचे निर्णय बदलले जाऊ शकत नाहीत. ज्याचा वरचा मजला रिकामा आहे, अशी व्यक्ती अशा गोष्टी बोलतो. ते समजू शकत नाहीत की, आम्ही कशा पद्धतीने या मुद्द्यांचा सामना करत आहोत. त्यांना हे तरी माहीत आहे का की रब्बी आणि खरीप पिकांची कधी पेरणी केली जाते, अशी खोचक टीका त्यांनी केली. 

राहुल गांधी यांना पिकांबाबत कोणतीच माहिती नाही आणि ते शेतकऱ्यांच्या हिताबाबत बोलत आहेत. त्यांचा वरचा मजला रिकामा आहे. कोणता विषय कोणासमोर मांडायचा हे त्यांना समजत नाही. ज्याला पिकांबाबत माहीत नाही तो कृषी कायद्यावर काय बोलणार, असे ते म्हणाले. 
हेही वाचा- गुजरात दंगलीचे डाग ते विकासपुरुष; 'सरकारप्रमुख' म्हणून मोदींचा विसाव्या वर्षांत प्रवेश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com