नवी दिल्ली - ज्येष्ठ पत्रकार-कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या झालेल्या हत्येवरुन कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघास लक्ष्य केले आहे. "या देशात भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीविरोधात जे बोलतील त्यांच्यावर दबाव आणला जाईल, हल्ला केला जाईल, मारहाण करण्यात येईल; वा त्यांची हत्याही करण्यात येईल,' असे टीकास्त्र राहुल यांनी सोडले आहे.
"मूलतत्ववाद्यांविरोधात लढणाऱ्या पत्रकार असलेल्या गौरी लंकेश यांच्या हत्येमुळे रुढ मतांविरोधात मते मांडणारा एक स्वतंत्र आवाज बळाने शांत करण्यात आला आहे. स्वतंत्र आवाज अशा पद्धतीने चिरडण्याची संघाची विचारसरणीच आहे. मात्र भारत असे हत्याकांड पुन्हा घडू देणार नाही,'' असे राहुल म्हणाले.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर बोलताना राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य केले. मोदी हे हे एक कसलेले हिंदुत्ववादी राजकारणी असल्याचा उपहासात्मक टोला राहुल यांनी लगावला आहे.
अशी घडविण्यात आली हत्या
आतापर्यंतच्या माहितीनुसार, लंकेश यांच्यावर मारेकऱयांनी जवळून तीन गोळ्या झाडल्या. त्या जागीच कोसळल्या. मारेकरी एकापेक्षा अधिक असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
बंगळूर पोलिस आयुक्तालयाने या घटनेबद्दल प्राथमिक माहिती दिली असून वरीष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.
गौरी लंकेश या उजव्या विचारसरणीच्या कट्टर विरोधक म्हणून प्रसिद्ध होत्या. लंकेश पत्रिके या साप्ताहिकाच्या त्या संपादक होत्या. शिवाय, अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांचे स्तंभलेखन प्रसिद्ध होत असे. टीव्ही वाहिन्यांवरील चर्चेत त्यांचा हिरीरीने सहभाग असे.
'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या
कलमाडींचे सक्रिय राजकारणात सहभागाचे संकेत
मंत्रिमंडळ विस्तार व खातेपालट - अन्वयार्थ
बीड: सोलापूर-धुळे महामार्गावर अपघातात तिघांचा मृत्यू
नाशिक: गणेशोत्सवातील अनावश्यक खर्च टाळून अनाथ मुलांना ड्रेसचे वाटप
बाप्पाच्या निरोपासाठी लोटला जनसागर
रस्त्याच्या मालकीवरून पर्यटकांची कोंडी
माहितीच्या सुरक्षेला कुठे आहे 'आधार'?
'त्यांनी' विद्यार्थीच नव्हे, तर गावालाही घडवले
नागरिक बनले पोलिस अधिकारी
|