

हिंदूंची लोकसंख्येबाबत आणि अपत्ये जन्माला घालण्याबाबत याआधी सरसंघचालक मोहन भागवत यांनी अनेकदा विधान केलंय. आता या विधानाचा समाचार शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी घेतलाय. बरेलीत देवभूमी इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इथं बोलताना शंकाराचार्यांनी तीन अपत्ये जन्माला घाला विधान करणाऱ्या मोहन भागवत यांनाच लग्न करण्याचा सल्ला दिलाय. शंकराचार्य म्हणाले की, मोहन भागवत आणि त्यांच्या प्रचारकांनी लग्न करावं आणि मुलं जन्माला घालून लोकसंख्या वाढवावी. Avimukteshwaranand takes dig at Mohan Bhagwat over remarks on population and family