चार राज्यांमध्ये पराभव होऊनही 'आप'ची लाट म्हणणे हास्यास्पद : स्मृती इराणी

'अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली महापालिकेचे १३ हजार कोटींचा निधी का रोखून ठेवला ?'
Arvind Kejriwal And Smriti Irani
Arvind Kejriwal And Smriti Irani esakal

नवी दिल्ली : पाच राज्यांपैकी चार राज्यांमध्ये पराभव झाल्यानंतर आम आदमी पक्षाची लाट असल्याचे म्हणणे हास्यास्पद आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर केली आहे. आज शुक्रवारी (ता.११) भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या. इराणी म्हणाल्या, उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh Assembly Elections 2022) नोटापेक्षा कमी मते मिळाली आहेत. उत्तराखंडमध्ये डिपाॅझिट जप्त झाले आहेत. गोव्यात सहा टक्क्यांपेक्षा कमी मते मिळाली आहेत, असे असताना 'आप'ची लाट म्हणणे हास्यास्पद असल्याचे त्या म्हणाल्या. (Smriti Irani Says, No Waves Of Aam Aadami Party In Assembly Elections)

Arvind Kejriwal And Smriti Irani
काँग्रेस पक्षाचे नेतृत्व कधीच शिकणार नाही, अमरिंदर सिंग यांचे टीकास्त्र

अरविंद केजरवाल यांना काही प्रश्न आहेत; दिल्ली सरकार जाणूनबुजून दिल्ली महापालिकेचे १३ हजार कोटींचा निधी रोखून ठेवला आहे. त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांचा निधी का रोखला याचे उत्तर द्यावे. झोपडपट्टीत राहणाऱ्यांचा सात वर्षांपासून निधी रोखून ठेवला आहे, असा आरोप स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com