आठवड्यात ४८ तास काम, पूर्वीपेक्षा कमी पगार, कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होणार?

केंद्र सरकार १ जुलै २०२२ पासून नवीन कामगार कायदा लागू करण्याची शक्यता आहे.
 कामगार कायदा
कामगार कायदा sakal

केंद्र सरकार १ जुलै २०२२ पासून नवीन कामगार कायदा लागू करण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही एखाद्या कंपनीत कर्मचारी असाल, तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की जर नवीन कामगार कायदा लागू झाला तर तुमच्यावर काय परिणाम होईल? चला तर जाणून घेऊया. (Impacts of new labour law on employees life which is likely to establish on 1st july)

 कामगार कायदा
करिअरच्या वाटेवर : अपारंपरिक मशिनिंग उत्पादनाचे क्षेत्र
  • पगार, पीएफ आणि ग्रॅच्युइटी या तिन गोष्टीवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

  • नवीन कामगार कायदा लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा टेक होम पगारही कमी होणार आहे. मात्र, पीएफमधील योगदान वाढेल.

  • नवीन कामगार कायद्यानुसार, भत्ते ५० टक्के मर्यादित करण्यात आले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण पगाराच्या ५० टक्के मूळ वेतन असेल. म्हणजे मूळ वेतन आणि पीएफच्या रक्कमेत बदल होणार आहेत.

 कामगार कायदा
संवाद : समुपदेशक काळाची गरज
  • कामचा आठवडा फक्त ४ दिवस होऊ शकतो.

  • नवीन कामगार कायदा लागू झाल्यास पुढील आर्थिक वर्षापासून कर्मचाऱ्यांना आठवड्यातून पाच ऐवजी फक्त चार दिवस काम करावे लागणार आहे. मात्र, त्याच्या बदल्यात कामगारांना दिवसाचे १२ तास काम करावे लागणार आहे. नवीन कायदा लागू झाल्यानंतर आठवड्यातून ४८ तास काम करण्याची तरतूद कायम राहणार असल्याचे कामगार मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

  • लीव पॉलिसीमध्ये सुद्धा बदल होऊ शकतो.

  • नवीन कामगार कायदा लागू झाल्यास रजेची पात्रता २४० कामकाजाच्या दिवसांवरून वर्षातील १८० दिवसांपर्यंत कमी करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com