'मला ना सारखं तोंड येत. मग चांगले पदार्थ खाता येत नाही की गरम काही पिता येत नाही' ही समस्या प्रत्येकाला कधी ना कधी जाणवतेच. तोंडाच्या आतील भागात फोड येणे, लाल होणे, काहीही खाताना जिभेची, हिरड्यांची आग होणे, तिखट, खारट व आंबट चवी जराही सहन न होणे अशा तक्रारी यात जाणवतात. यात ओठ, जीभ, पडजीभ, घसा, टाळा यांना सुज येते. त्यामुळे आपल्याला काहीही खाता येत नाही आणि नीट गिळताही येत नाही. हे दुखणे फार मोठे नसलं तरी त्याचा त्रास खुप होतो. वारंवार तोंड त्यामुळे वेळीच त्यावर योग्य ते उपचार घेणे महत्वाचे आहे.
कारणे काय ?
ही काळजी घ्या
अति जागरण, मानसिक ताण तणाव, ब - 12 जीवनसत्वाचा अभाव, अवेळी जेवणे यामुळे तोंड येण्याची समस्या जाणवते. तोंड आल्यानंतर अतिगरम, थंड पदार्थ घेऊ नयेत. तिखट, मसालेदार पदार्थ वर्ज्य करावेत.
- डॉ. अशोक पाटील, कोल्हापूर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.