रत्नागिरीत येणार्‍या प्रत्येकाची कोरोना चाचणी; वाचा काय सरु, काय बंद

जिल्ह्याच्या सीमांवर तसेच रेल्वे, बसस्थानक येथीही प्रवाशांची तपासणी होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.
रत्नागिरीत येणार्‍या प्रत्येकाची कोरोना चाचणी; वाचा काय सरु, काय बंद

रत्नागिरी : जिल्ह्यात येणार्‍या प्रत्येकाची कोरोना चाचणी बंधनकारक आहे. चाचणीनंतरच प्रवेश दिला जाईल. जिल्ह्यात उद्यापासून कोणालाही अत्यावश्यक सेवा किंवा महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही. जिल्ह्याच्या सीमांवर तसेच रेल्वे, बसस्थानक येथीही प्रवाशांची तपासणी होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.

झुम अ‍ॅपद्वारे झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, जिल्ह्यात उद्यापासून अत्यावश्यक सेवेशिवाय कोणही बाहेर पडू शकत नाही. काही सवलती सकाळी 7 ते संध्याकाळी 8 पर्यंत, अत्यावश्यक सेवा, वाहतूक, सार्वजनिक प्रवास करायाचा असले तर तसे ठोस कारण असणे आवश्यक आहे. त्याशिवाय प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही. उद्यापासून तपासणी नाक्यावर कडक तपासणी केली जाईल. विनाकारण फिरणार्‍यांवर कडक कारवाई करू. नियम पाळून स्थानिक पातळीवर कोरोनाला नियंत्रित करायचे आहे. तपासण्या वाढविल्यामुळे बाधितांचा आकडा 5 हजारापर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज आहे.

अत्यावश्यक सेवेसाठी काही सवलती दिल्या आहेत. खाद्यपदार्थ, भाजीची दुकाने बंद राहणार आहेत. मात्र त्यांना घरपोच सेवा देता येणार आहे. तसेच ज्या व्यापार्‍यांना होम डिलिव्हरी देता येत नाही, त्यांना संपूर्ण चाचणी करून परवानगी घेऊन आळीपाळीने दुकाने उघडी ठेवता येतील का, याबाबत विचार सुरू आहे. होम डिलिव्हरी करणार्‍यांकडे परवानगीचे स्टिकर असणे बंधनकारक आहे.

बांधकाम व्यवसायावरही बंधने घातली आहेत. पावसापूर्वीच्या कामांनाच परवानगी दिली आहे. सार्वजनिक बांधकामचा तो अधिकृत ठेकेदार असणे अनिवार्य आहेत. बांधकाम कामगारांची राहण्याची व्यवस्था असलेल्या ठिकाणी त्यांची चाचणी करून काम सुरू ठेवता येणार आहे. पेट्रोल पंपावर आता अत्यावश्यक सेवेसाठी असलेल्या वाहनांनाच पेट्रोल मिळणार आहे. पॅकिंगशी निगडित काही उद्योग बंद ठेवण्यात येणार आहेत. तर काही 50 टक्के कामगारांच्या उपस्थितीला उद्योग सुरू ठेवले जाणार आहेत. मात्र त्यांची चाचणी बंधनकारक आहे. शासकीय कार्यालयातही 50 टक्के कर्मचारी राहतील. कामासाठी येणार्‍यांची एसएमएस संदेशाद्वारे कामे केली जातील.

असे आहेत निर्बंध

रेस्टॉरंट, बार, हॉटेलना होम डिलेव्हरीची मुभा आहे. वडापावच्या गाड्या बंद राहतील. भाजीपाल्यासाठी एक ठिकाण निश्‍चित करून त्या-त्या वॉर्डमध्ये विक्रीची सवलत दिली जाईल. शॉपिंग सेंटर, मॉल सर्व बंद. सांस्कृतिक सार्वजनिक कार्यक्रम, शाळा महाविद्यालय, खासगी क्लासेस, सलून, स्पा बंद राहतील.
लग्न समारंभाला 25 व्यक्तींची परवानगी असली तरी ते पुढे ढकलावे, अशी सूचना मिश्रा यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com