Ranji Trophy 2024 Final : तो निर्णय कर्णधाराचा! मोठ्या पराभवानंतर तमिळनाडू ब्लेम गेम सुरू

sai kishore
sai kishoreesakal

Ranji Trophy 2024 Tamil Nadu : रणजी ट्रॉफी उपांत्य फेरीतील मुंबई विरुद्ध तमिळनाडू सामना एकतर्फी होता. मुंबईने तमिळनाडूचा एक डाव आणि 70 धावांनी पराभव झाला.

तमिळनाडूचा संघ मुंबईविरुद्धच्या रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत खराब खेळला. त्यामुळे मुंबईने तीन दिवसात सामना संपवून ४८व्या रणजी ट्रॉफीची अंतिम फेरी गाठली तमिळनाडूच्या मोठ्या पराभवानंतर प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी अपयशाचे कारण सांगितले.

sai kishore
PSL Ball boy : बॉलबॉय असलो म्हणून काय झालं जलवा तर आपलाच! पाकिस्तानातील हा Video तुफान व्हायरल, टॅलेंट पाहून मुनरोही भारावला

सामन्यानंतर, त्यांनी कर्णधार आर साई किशोरने गोलंदाजांसाठी पोषक परिस्थितीत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने संघाने नाणेफेकच्या वेळी सामना गमावल्याचे स्पष्ट केले.

सुलक्षण कुलकर्णी ESPNCricinfo शी बोलताना म्हणाले की, "मी नेहमी स्पष्ट बोलतो. आम्ही पहिल्या दिवशी 9 वाजता सामना हरलो, ज्या क्षणी मी विकेट पाहिली तेव्हा मला नक्की कळले की आम्हाला काय मिळणार आहे. सर्व काही ठरले होते, आम्ही नाणेफेक जिंकली, एक प्रशिक्षक म्हणून, एक मुंबईकर म्हणून मला परिस्थिती चांगली माहीत आहे. आम्ही गोलंदाजी करायला हवी होती पण कर्णधाराचा विचार वेगळा होता.”

sai kishore
Paris Olympics : टेबल टेनिस संघाने इतिहास रचला ; पॅरिस ऑलिंपिकसाठी पात्र

अपेक्षेप्रमाणे, प्रथम फलंदाजी करण्याचा टीएनचा निर्णय वाईटरित्या उलटला.आमची पहिल्या डावात 42/5 अशी अवस्था झाली होती. कमी नंतर तमिळनाडूचा डाव 146 धावांवर आटोपला. त्यानंतर, त्यांनी मुंबईला 378 धावा केल्या आणि नंतर दुसऱ्या देखील तमिळनाडीचा डाव 162 धावात संपुष्टात आला.

(Cricket News In Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com