

Ambati Rayudu Criticises Note Trend
esakal
Ambati Rayudu Criticises Note Trend: आयपीएल (IPL) २०२६ चा हंगाम आता काही दिवसच राहिला आहे. हंगाम सुरू झाल्यापासून एक ट्रेंड सुरू झाल्यासारखाच झाला आहे. विकेट घेतल्यानंतर आणि शतक-अर्धशतक झाल्यानंतर चिठ्ठी काढून जल्लोष करताना खेळाडू हंगामात दिसले. जल्लोष करण्याचा हा प्रकार आता चर्चेचा विषय बनला आहे. उर्वील पटेल, (Urvil Patel) रघू शर्मा(Raghu Sharma) आणि आकाश सिंग यांनी चिठ्ठी सेलिब्रेशन केलं आणि ते सोशल मीडियावर व्हायरल देखील खूप झालं.