

Riyan Parag
esakal
आयपीएल २०२६ हंगामात आतापर्यंत अपराजित राहिलेला संघ राजस्थान रॉयल्सला काल मोठा पराभव स्वीकारावा लागला. सनरायझर्स हैदराबादने धडाकेबाज फलंदाजी करत राजस्थानला २१७ धावांचं लक्ष्य दिलं होतं, ज्यात हैदराबादचा कर्णधार ईशान किशनने ४४ चेंडूत ९१ धावा केल्या. ईशानचं शतक थोडक्यात चुकलं असलं तरी त्याने संघाला चांगली सुरुवात करून दिली, कारण सलामीला आलेला अभिषेक शर्मा शून्यावर परतला. त्यानंतर ईशान आणि हेनरिक क्लासेन यांनी चांगली फलंदाजी केली. नंतर सनरायझर्स हैदराबादने राजस्थानला १५९ धावांवरच रोखत मिळालेल्या ५७ धावांच्या पराभवानंतर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने कुठे चूक झाली आहे, यावर भाष्य केले.