राज्यातील १४ जिल्हे निर्बंधमुक्त; रेस्तरॉं, सिनेमागृह १०० टक्के क्षमतेनं होणार सुरु

नव्याने जाहीर करण्यात आलेली नियमावली 4 मार्चपासून लागू होणार आहे.
Hotel & Theaters Will Reopen in Maharashtra
Hotel & Theaters Will Reopen in MaharashtraSakal

मुंबई : राज्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत असताना राज्य सरकारकडून कोरोना निर्बंधांबाबत मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील 14 जिल्हे पूर्णपणे निर्बंधमुक्त करण्यात आल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमधील कोरोनोचे सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. राज्यासरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाल आहे. नव्याने जाहीर करण्यात आलेली नियमावली 4 मार्चपासून लागू होणार आहे.(Maharashtra Corona Restrictions New Guidelines)

Hotel & Theaters Will Reopen in Maharashtra
तिसऱ्या महायुद्धाबाबत रशियाच्या मंत्र्याचे मोठे विधान, दिला इशारा

शिथिल करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये सिनेमा हॉल, बार-रेस्टॉरंट, स्पोर्ट कॉम्प्लेक्स, जिम, स्पा, स्विमिंग पूल, धार्मिक स्थळ, नाट्य गृह, पर्यटन स्थळ, मनोरंजन पार्क आदी ठिकाणे 100 क्षमतेसह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. इतर जिल्ह्यात 50 टक्के क्षमतेची अट कायम राहणार आहे. शिथिलता देण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये खासगी आणि सरकारी अशा दोन्ही प्रकारच्या कार्यालयांना देखील पूर्ण क्षमतेनं काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच या जिल्ह्यांमधील सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये ऑफलाईन वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात संबंधित सरकारी विभाग वा स्थानिक प्रशासनाने दिलेल्या निर्देशांनुसार हे वर्ग सुरू करता येतील. अंगणवाडी आणि शिशुगटांचे वर्ग देखील सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Hotel & Theaters Will Reopen in Maharashtra
युक्रेनमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, उपचारावेळी गेला जीव

दरम्यान, राज्य सरकारकडून शिथिलता देण्यात आलेल्या अ वर्गातील जिल्ह्यांसाठी 1 डोस 90 टक्के पूर्ण, 2 डोस 70 टक्के, पॉझिटिव्ह रेट 10 टक्क्यांहून कमी, ऑक्सिजन बेड 40 टक्क्यांहून कमी या निकषांवर शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना 100 टक्के निर्बंध मुक्त करण्यात आले असून, याठिकाणी सिनेमा हॉल, बार-रेस्टॉरंट, स्पोर्ट कॉम्प्लेक्स, जिम, स्पा, स्विमिंग पूल, धार्मिक स्थळ, नाट्य गृह, पर्यटन स्थळ, मनोरंजन पार्क आदी ठिकाणे 100 क्षमतेसह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. अ श्रेणीमध्ये येणाऱ्या सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व प्रकारच्या सार्वजनिक ठिकाणी 100 टक्के क्षमतेने कामकाज करण्याची मुभा देण्यात आली असून, शिथिलता न देण्यात आलेल्या इतर जिल्ह्यांमध्ये ही क्षमता 50 टक्के असणार आहे.

Hotel & Theaters Will Reopen in Maharashtra
पतंजलीचं आलं 'क्रेडीट कार्ड'; जाणून घ्या काय आहे खासियत

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मागील महिन्याभरात मोठी घट झाल्याने सार्वजनिक निर्बंध लकवरच शिथील होणार असल्याची माहिती राज्य सरकारमार्फत देण्यात आली होती. तसेच लागू करण्यात आलेली जमावबंदी आणि मोठ्या कार्यक्रमांवरील मर्यादांवरील निर्बंध शिथील केले जाऊ शकतात असे सांगण्यात आले होते. त्यानंतर आता राज्य सरकारकडून याबाबत आदेश जारी करण्यात आले असून, यामध्ये राज्यातील 14 जिल्ह्यांना 100 टक्के निर्बंध मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना तुर्तास दिलासा मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com