एसटीचे 50 हजार कर्मचारी संपातच! अजितदादांनी दिली 31 मार्चची डेडलाईन

सर्व संपकऱ्यांनी 31 मार्चपर्यंत कामावर यावे, अन्यथा कठोर भूमिका घेतली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. तरीही, सद्यस्थितीत 49 हजार 637 कर्मचारी संपातच आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतरही कर्मचारी संपावर ठाम असल्याने महामंडळाकडून संबंधितांवर कठोर कारवाई निश्‍चित मानली जात आहे.
dcm ajit pawar
dcm ajit pawaresakal

सोलापूर : सातव्या वेतन आयोगाच्या जवळपास एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली असून त्यांच्या वेतनाची हमी राज्य शासनाने घेतली आहे. कर्मचाऱ्यांचे निलंबन, बडतर्फीदेखील थांबविली आहे. त्यामुळे सर्व संपकऱ्यांनी 31 मार्चपर्यंत कामावर यावे, अन्यथा कठोर भूमिका घेतली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. तरीही, सद्यस्थितीत 49 हजार 637 कर्मचारी संपातच आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतरही कर्मचारी संपावर ठाम असल्याने महामंडळाकडून संबंधितांवर कठोर कारवाई निश्‍चित मानली जात आहे.

dcm ajit pawar
माजीमंत्री सावंत म्हणाले..! शिवसेनेचा मुख्यमंत्री, तरीही अर्थसंकल्पात दहा टक्‍केच निधी

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते मिळावेत, या मागणीसाठी जवळपास 95 हजार कर्मचाऱ्यांनी 27 ऑक्‍टोबरपासून संप पुकारला आहे. आजवर 100 पर्यंत कर्मचाऱ्यांनी विविध कारणास्वत आत्महत्या केल्या आहेत. तरीही, त्यासंदर्भात अजूनही ठोस तोडगा निघालेला नाही. दरम्यान, हा विषय सध्या उच्च न्यायालयात असून न्यायालयाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना सकारात्मक तोडग्याची अपेक्षा आहे. विलीनीकरणासंदर्भातील समितीने विलीनीकरण करणे आर्थिकदृष्ट्या परवडणार नसल्याचा अहवाल दिला आहे. तरीही, कर्मचारी त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. तत्पूर्वी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहनमंत्री अनिल परब यांनी संपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. पण, कर्मचाऱ्यांनी अजूनपर्यंत संप मागे घेतलेला नाही. पाच महिन्यांपासून संप सुरु असल्याने एसटीचा प्रवासी खासगी वाहनातून प्रवास करू लागला आहे. दहावी-बारावीसह एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय त्यामुळे झाली. तरीही, कर्मचारी त्यांच्या मागणीवर ठाम असून आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्मचाऱ्यांना 31 मार्चपर्यंत डेडलाईन दिली आहे. आता पुढील तीन दिवसांत संप मिटणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेतली जाणार आहे.

dcm ajit pawar
यंदा शेतकऱ्यांना मिळणार 4200 कोटींचे कर्ज! तीन लाखांच्या कर्जावर शून्य टक्‍के व्याज

महामंडळाची सद्यस्थिती
एकूण कर्मचारी

81,673
कामावर आलेले कर्मचारी
32,046
संपातील कर्मचारी
49,637
संपामुळे बुडालेले अंदाजित उत्पन्न
1,980 कोटी

dcm ajit pawar
मोठा निर्णय! शनिवारी, रविवारीही आता पूर्णवेळ भरणार शाळा

दररोज सहा-साडेसहा कोटींचेच उत्पन्न
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे 32 हजार 46 कर्मचारी सध्या कामावर हजर झाले आहेत. त्यांच्या माध्यमातून जवळपास पाच हजार गाड्या विविध मार्गांवर धावत आहेत. संपापुर्वी महामंडळाला दररोज 22 कोटींचे उत्पन्न मिळत होते. पण, संपामुळे महामंडळाचे उत्पन्न दररोज सरासरी सहा ते साडेसहा कोटींपर्यंतच आहे. त्यामुळे महामंडळाचा संचित तोटा 12 हजार कोटींहून अधिक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, कर्मचारी कामावर रुजू झाल्यानंतर प्रत्येकाला उत्पन्नाचे टार्गेट देऊन तो संचित तोटा भरून काढण्याचा प्रयत्न होईल, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com