नव्या सरकारचा शपथविधी नियमबाह्य असल्याने रद्द करा : चंद्रकांत पाटील

PARTIL.jpg
PARTIL.jpg

मुंबई : उद्धव ठाकरे सरकारने नियमबाह्य काम सुरु केले आहे. शपथविधी सोहळ्यामध्ये मंत्र्यांनी शपथ घेताना आपापल्या नेत्यांची नावे घेतली हे बेकायदेशीर आहे. त्यामुळे सरकारचा शपथविधी रद्द करावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

राज्यातील सत्तासंघर्षाच्या नाट्यमय घडामोडीनंतर महाविकास आघाडीचा शपथविधी सोहळा गुरुवारी शिवाजी पार्क येथे पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 6 जणांना मंत्रिपदाची शपथ घेतली. पण मंत्र्यांनी शपथ घेताना नेत्यांची नावेघेतली हे नियमबाह्य असून हा शपथविधी रद्द करा अशी मागणी भाजपा आमदाराने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे याचिकेद्वारे केली आहे अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, या नव्या सरकारने नियमबाह्य काम सुरु केले आहे. शपथविधी सोहळ्यामध्ये मंत्र्यांनी शपथ घेताना आपापल्या नेत्यांची नावे घेतली हे बेकायदेशीर आहे. कायद्याप्रमाणे शपथ घेताना असे म्हणता येत नाही. त्यामुळे हा शपथविधी रद्द करा अशी याचिका करण्यात आली आहे. भाजपा आमदाराने ही याचिका केली आहे, जर राज्यपालांनी न्याय दिला नाही तर सुप्रीम कोर्टात हे प्रकरण जाईल असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

त्याचसोबत जर राज्यपालांनी ही याचिका स्वीकारली तर सरकारने या 2 दिवसांत घेतलेले निर्णय रद्द होतील असेही ते म्हणाले. दरम्यान, नव्या सरकारने नियम धाब्यावर बसवले आहेत, नियमबाह्य काम करु देणार नाही, आम्ही प्रबळ विरोधी पक्ष म्हणून याचा विरोध करु, एवढचं नव्हे तर कायद्यानुसार कोणत्याही सभागृहाचा सभासद नसताना मुख्यमंत्री अथवा पंतप्रधान होता येत नाही असं सांगत येणाऱ्या काळात उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदावरुनही भाजपा आक्रमक होणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखविले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com