मुंबई : सत्यमेव जयते ! अशी पहिली प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सर्वोच्च न्यायालयाने १२ भाजप आमदारांचे निलंबन रद्द केल्याच्या निर्णयावर दिली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, आमच्या १२ भाजपचे (BJP) महाराष्ट्रातील आमदारांचे निलंबन रद्द करुन ऐतिहासिक निर्णय दिल्याबद्दल आम्ही आदरणीय सर्वोच्च न्यायालयाचे आभार आणि धन्यवाद मानतो. ही बारा आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात ओबीसींसाठी लढत (12 BJP Maharashtra MLAs Suspension Case) होती. त्यावेळी त्यांचे निलंबन करण्यात आले. आदरणीय सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने लोकशाही मूल्ये वाचली.(Devendra Fadanvis Welcome Supreme Court Judgement On 12 BJP MLAs Suspension)
आणि असंविधानिक, अनैतिक, बेकायदेशीर आणि अलोकशाही कृत्ये आणि कार्यासाठी ही एक महाविकास आघाडी सरकारला जबर चपराक आहे. मी आमच्या महाराष्ट्रातील १२ आमदारांचा न्याय मिळल्याबद्दल अभिनंदन करतो. सुरुवातीपासूनच आम्ही म्हणत होतो की असंविधानिक आणि सत्तेचा पूर्णपणे गैरवापर करुन आमच्या आमदारांना दीर्घकाळासाठी निलंबित करुन कृत्रिम बहुमत तयार करणे, ते योग्य कारणासाठी वैध नव्हते आणि आदरणीय सर्वोच्च न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला.
हा केवळ १२ आमदारांचा प्रश्न नाही. मात्र त्या १२ विधासभेतील हा ५० लाखांपेक्षा अधिक नागरिकांचा प्रश्न होतो. लोकशाही वाचली!!, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.