कोल्हापुरात तिसऱ्या लाटेचा धोका अटळचं; मंत्री हसन मुश्रीफ

प्रशासनाची तयारी पूर्ण, निर्बंध पाळण्याचे आवाहन; हसन मुश्रीफ
hasan mushrif
hasan mushrifsakal

कोल्हापूर : फेब्रुवारी महिन्यात कोल्हापुरात (Kolhapur)तिसऱ्या लाटेचा धोका अटळ आहे, त्यामुळे निर्बध येणारच आहेत. ते आता उबंरठ्यावर आले आहे. मुंबईतील रुग्णांची (Mumbai Coronavirus)संख्या आता वाढून लोक गावी येतील, त्यानंतर पुन्हा येथील संख्या वाढेल. त्याची तयारी प्रशासनाने केलेली आहे. मात्र ६५ ते ७० टक्के लोकांना दवाखान्यात दाखल करायची गरज भासत नाही. त्यांना घरीच उपचार घेता येतात, काहींनाच आयसीयू आणि ऑक्सिजनची आवश्‍यकता लागते. त्यामुळे काळजी करायची गरज नाही. केवळ निर्बंध पाळणे आवश्‍यक आहे, असेही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी आज स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांच्या प्रश्‍नावर त्यांनी ही माहिती दिली.

hasan mushrif
Political News: आमचा विजय निश्चित, निवडणूक एकतर्फीच; पी. एन. पाटील

मंत्री मुश्रीफ म्हणाले, की दुसऱ्या लाटेचा विचार करता ती पहिल्यांदा मुंबई, पुणा, केरळ, दिल्ली अशा ठिकाणी ती आली. त्यानंतर शेवटी ती लाट कोल्हापुरात पोचली. तिसऱ्या लाटेचेही असेच होणार आहे. देशात आपण कोणाला आडवू शकत नाही. मुंबईत वीस हजार रुग्ण झाल्यास लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे कालच आयुक्तांनी जाहीर केले आहे. सध्या कोल्हापुरात संख्या कमी आहे, टेस्टींग ही कमी आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अनुभव विचारात घेवून ऑक्सिजन आणि बेडची उपलब्धता आपण केली आहे. तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सिजन प्लॅन्ट बसविले आहेत. कालच पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी आढावा घेतला आहे. मीही कागल मध्ये बैठक घेतली आहे. मी नगर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, तेथेही जावून बैठक घेणार आहे.

अन्य प्रश्‍नांवर मंश्री मुश्रीफ म्हणाले,‘‘ बुस्टर डोस फ्रंट वर्कर आणि ज्येष्ठ नागरिकांना देण्याचा निर्णय आजच झाला आहे. त्यानुसार त्याचेही नियोजन सुरू आहे. ते कोल्‍हापुरातही दिले जातील. तसेच लॉकडाऊनच्या विरोधात व्यापारी आहेत, लॉकडाऊन नको अशी मानसिकता असली तरीही निर्बंध आवश्‍यक आहेत. मास्क वापरा म्हटले तर वापर नाहीत, गर्दी करू नका म्हटले तरीही करतात. लहान मुलांना याची लागन होऊ नये म्हणून जादा खबरदारी घेण्याची गरज आहे. कालच आरोग्य मंत्र्यांनी सांगितले, की देशभरात एकच नियम असावेत, कर्नाटकात (Karnatka) ॲन्टीजेन टेस्ट, आरटीपीसीआर सक्तीचे केले आहे, असे होऊन चालणार नाही. राज्यात आणि देशात एकच निर्बध आवश्‍यक आहेत. कोणालाच लॉकडाऊन नको आहे. यामुळे शासनाचाही महसूल बडुतो. पण याला पर्याय नाही.

कोरोनाचे निर्बंध सर्वांनी पाळले पाहिजेत. मात्र तुम्ही म्हणाल की, जिल्हा बॅंकेसाठी तुम्ही मेळावे घेतले आणि आता तुम्ही गर्दी करू नका म्हणून सांगताय काय? पण ही निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे घ्यावी लागली आहे. त्यामुळे केवळ मेळावे घेतले म्हणून कोणीही निर्बंधाकडे दुलर्क्ष करून चालणार नाही. आता लहान मुलांना याचा धोका अधिक आहे याचा विचार सर्वांनी करून निर्बंध पाळले पाहिजेत, असेही मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकारांच्या प्रश्‍नावर स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com