आज (ता. ४) पहाटे ४ वाजता वीर धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने धरणाच्या सांडव्यावरून होणारा विसर्ग बंद करण्यात आला आहे. सध्या धरणाच्या अतिवाहकाद्वारे ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीपात्रात सुरू ठेवण्यात आला आहे. तसेच, पर्जन्यमान व धरणात होणाऱ्या पाण्याच्या आवकेनुसार (येवेनुसार) विसर्गाचे प्रमाण कमी अथवा जास्त करण्याची शक्यता असल्याची माहिती कार्यकारी अभियंता नीरा उजवा कालवा विभाग, फलटण यांनी दिली.