पुणेः मुठा नदीला पूर आल्यानंतर सिंहगड रस्त्यावरील एकतानगरी येथे पाणी घुसू नये यासाठी सीमा भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र, या कामाला कार्यादेश देऊनही ठेकेदाराने अजून कामच सुरु केले नाही. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी त्या ठिकाणी पाहणी करून अधिकाऱ्यांची झाडाझती घेतली. तर पावसाळा जवळ आलेला असतानाही महापालिकेने काहीच उपाययोजना न केल्याने नागरिकांनी आयुक्तांना घेराव घातला.