

Maharashtra Rain Alert
ESakal
मुंबई : राज्यभरात पावसाच्या सरी कोसळत असून शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या पाणलोट क्षेत्रातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक धरणे फुल्ल भरले असून पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या शहरांना दिलासा मिळत आहे. अशातच हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाचे हे हवामान महाराष्ट्रात कायम राहणार असल्याचे म्हटले आहे.