आसाममधील पूरस्थितीवरून शिंदेंवर पटोलेंचा हल्लोबोल, निर्लज्जपणाचा कळस!
कॉंग्रेसचे नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असल्याचं चित्र आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचं बंड आणखी तीव्र होताना दिसत आहे. शिवसेनेचे निम्म्याहून अधिक मंत्री शिंदे गटात गेले असून गटाकडे आमदारांचा ओढा कायम आहे. (maharashtra politics) यामुळे राजकीय वर्तुळात अनेक उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, आता कॉंग्रेसचे नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे.
नाना पटोले यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. यात ते म्हणतात, एकनाथ शिंदेनी काल भाजपाचा अप्रत्यक्षपणे स्वतःहून उल्लेख केला. आसाममध्ये महापूर आला असतानाही त्यांची 'महाशक्ती' मात्र बंडखोर आमदारांना सांभाळण्यातच व्यस्त आहे. हा सर्व निर्लज्जपणाचा कळस, असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली आहे.
दरम्यान, राज्यातील अनेक अपक्षांचाही शिंदेंना पाठिंबा आहे. या सगळ्यांसह आता शिंदे राज्यपालांना संख्याबळाबद्दलचं पत्र देणार आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीतल्या सर्वच पक्षांच्या आता आपापल्या नेत्यांसोबत सतत बैठका सुरू केल्या आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही आता शरद पवार यांची भेट घेतली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण आणखी तापलं आहे.
आसामधील कॉंग्रेस प्रमखांचे एकनाथ शिंदेंना पत्र..
या सर्व घडोमोडीत आता आसाम कॉंग्रेसचे प्रमख भूपेन कुमार बोराह यांनी महाराष्ट्रातील शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि एकनाथ शिंदे यांनी पत्र लिहीत लवकरात लवकर आसाम सोडण्याचे आवाहन केले आहे. राज्याच्या हितासाठी आसाम कॉंग्रेसने एकनाथ शिंदेंना आसाम सोडण्याचे आदेश दिले आहेत. आसाममधील लोक नैतिकतेला महत्त्व देतात. महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेनेच्या आमदारांसह गुवाहाटीमध्ये तुमची उपस्थिती राज्याला चुकीचा संदेश देत आहे. असे बोरा यांनी पत्रांत म्हटलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.