शिवजयंती : पुण्यवंत, सामर्थ्यवंत! नीतिवंत, जाणता राजा!

रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप उत्तमपणे रचला.
छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराजनिकिता जंगले

रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) खूप उत्तमपणे रचला. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारून त्यांनी महाराष्ट्र घडवला. याच आपल्या राज्याचा आज जन्मदिवस. छत्रपतींचे नाव डोळ्यासमोर आले एक वेगळीच प्रतिमा तयार होते ज्या राजाने त्याचे संपूर्ण आयुष्य जनतेसाठी रयतेसाठी वाहले त्या रयतेच्या राजाचे कौतुक करावे तितके कमी आहे.शिवरायांचा हिंदवी स्वराज्य निर्मितीचा ध्यास असो, महाराष्ट्र घडवण्याचा त्यांचे योगदान असो, मराठा साम्राज्याचा इतिहास असो, महाराजांचे कार्य आणि त्यांचे शौर्य सदैव प्रेरणादायी आहे.

शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. खरं तर त्यांच्या जन्मतारखेबद्दल बरेच वाद होते यावर महाराष्ट्र सरकारने तोडगा काढत 2001 या वर्षी 19 फेब्रुवारी ही जयंती शिवरायांची जन्मतारीख निश्चित केली आणि तेव्हापासून 19 फेब्रुवारीला शिवजयंती देशभरात उत्साहात साजरी केली जाते.

छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजीराजांचे मानवतावादी तत्त्वज्ञान

आदिलशाही, निजामशाही आणि मुघल सत्ता किंवा स्वराज्यावर आलेल्या प्रत्येक संकटाला अत्यंत धैर्याने छत्रपती शिवाजी महाराजानी सामना केला आणि ते यशस्वी ठरले. छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा अजरामर आहे त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य रयतेच्या सुखासाठी स्वराज्याच्या स्वप्नासाठी वाहले. शेवटच्या क्षणापर्यंत ते लढले. अखेर रायगडावर ३ एप्रिल १६८० रोजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला. एक दक्ष राजा रयतेला पोरका करून गेला. मात्र महाराजांचं कर्तृत्व पराक्रम अनंत काळासाठी अजरामर आहे.

असे म्हणतात.. महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) यांनी 1869 साली रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधी स्थळ शोधून काढले आणि त्यांनी महाराजांच्या जीवनावर आधारित पहिला पोवाडा लिहला.

शिवजयंती आली की शिवरायांचा आपण जयघोष करतो मात्र केवळ आणि केवळ शिवजयंती पर्यंतच महाराजांना मर्यादित ठेवायचे आहे का याचा विचार करायला हवा. महाराजांच्या नावाचा जयघोष करणाऱ्यांचा महाराष्ट्रात सुकाळ आहे आणि त्यांच्या विचारांना कृतीत आणणार्‍या लोकांचा मात्र दुष्काळ आहे ही महाराष्ट्राची सध्याची वास्तविकता आहे.

छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज जयंती! दहा गोष्टी ज्या तुम्हाला माहिती असायलाच हव्यात

आज खरं तर महाराष्ट्राला शिवाजी महाराजांच्या आचार-विचारांची गरज आहे महाराजांनी शिकवलेल्या त्या छोट्या छोट्या मूल्यांची जपणूक करण्याची गरज आहे महाराष्ट्रातील महाराजांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या गड-किल्ल्यांचे संवर्धन करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे या सर्व व्यतिरिक्त महाराजांच्या आदरांजली देण्याकरिता केवळ आणि केवळ शिवजयंतीच्या चौकटीत न राहता शिवरायांची विचारसरणी आत्मसात करून ती प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणणे आवश्यक आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com