आगामी ९४ वे मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये घ्या, साहित्य मंडळाकडे प्रस्ताव

0Sahitya_20Sammelan_2
0Sahitya_20Sammelan_2

औरंगाबाद  : आगामी २०२१ मध्ये होणाऱ्या ९४ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिक येथे घ्यावे असा प्रस्ताव अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाकडे आला आहे. मंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्याकडे नाशिकच्या लोकहितवादी मंडळाने हा प्रस्ताव पाठविला आहे. नाशिकमधील विविध सेवाभावी संस्था, राजकीय मान्यवर, साहित्यप्रेमी साहित्यिक यांच्या सहकार्याने हे संमेलन आम्ही चांगल्या प्रकारे आयोजित करु असा विश्‍वास असल्याचे लोकहितवादी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

साहित्य संमेलनासाठी लागणाऱ्या खर्चासाठी संस्थेच्या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. संमेलनाचा प्रस्ताव लोकहितवादी मंडळाचे विश्‍वस्त हेमंत टाकले, अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, कार्याध्यक्ष मुकुंद कुलकर्णी आणि सचिव सुभाष पाटील यांच्यावतीने साहित्य मंडळाचे अध्यक्ष ठाले पाटील यांना देण्यात आला आहे. यंदा ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेन उस्मानाबाद येथे पार पडले. कोरोनामुळे आगामी संमेलन होणार की नाही ही चर्चा होत असताना लोकहितवादी मंडळाचा प्रस्ताव आला आहे.


कविवर्य कुसुमाग्रजांच्या संकल्पनेतून मंडळाची स्थापना
लोकहितवादी मंडळाची स्थापना नाशिकमध्ये  कविवर्य कुसुमाग्रज यांच्या संकल्पनेतून सप्टेंबर १९५० झाली आहे. मंडळ नाशिकमध्ये सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, कला आदी क्षेत्रांत काम करित आहे. संस्थेला मानाचा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचा पुरस्कार मिळाला आहे. शारदीय व्याख्यानमाला संस्थेकडून चालविली जाते. तसेच बालकांसाठी चिरंजीव तर कुसुमाग्रजांनी ज्येष्ठ नागरिकांचे प्रबोधन व समुपदेशनासाठी सुरु केलेला तीर्थरुप हा उपक्रम संस्थेकडून राबविला जात आहे.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com