अक्षय कुमार मुंबई सोडणार? उत्तराखंडचा रहिवासी होणार...

उत्तराखंडचे 'ब्रॅंड अॅम्बेसिडर' होण्याच्या निमित्तानं अभिनेत्यानं सांगितली 'मन की बात'
Akshay Kumar, Pushkar Singh Dhami(Uttarakhand CM)
Akshay Kumar, Pushkar Singh Dhami(Uttarakhand CM)Google

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) आता उत्तराखंडचा ब्रॅंड अॅम्बेसिडर होणार आहे. यासंदर्भात उत्तराखंडचे(Uttarakhand) मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी(Pushkar Singh Dhami) यांनी देहरादूनमध्ये अक्षय कुमारची भेट घेतली. तसंच यादरम्यान मुख्यमंत्री धामी यांनी अक्षय कुमारला पुष्पगुच्छ देत पहाडी टोपीही सन्मानाने घातली. यासंदर्भात बोलताना धामी म्हणाले की,''आम्ही अक्षय कुमारकडे एक प्रस्ताव मांडला आहे. त्यांनीही त्याचा स्विकार केला आहे. अक्षय कुमार यापुढे उत्तराखंडचा ब्रॅंड अॅम्बेसिडर म्हणूनही काम करणार आहे''. मुख्यमंत्री धामी यांनी यावेळी अक्षयला केदारनाथ मंदिराची प्रतिमूर्तीही भेट म्हणून दिली आहे. त्याचवेळी अक्षयने येत्या काही वर्षात उत्तराखंडमध्ये घर बांधून तिथे राहण्याची आपली इच्छा आहे असे बोलून दाखविले.

Akshay Kumar, Pushkar Singh Dhami(Uttarakhand CM)
'ये हसीं वादियां,ये खुला आसमां' हनिमूनला गेलेल्या मौनीचा रोमॅंटिक मूड

''३१ वर्षांच्या आपल्या फिल्मी करिअरमध्ये आपण खूप ठिकाणी शूटिंगच्या निमित्तानं फिरलो पण सर्वात सुंदर उत्तराखंड आहे असं मला वाटतं. उत्तराखंडमधील निसर्गानं आपल्याला मोहित केलंय'', असंही पुढे तो म्हणाला. यावेळी मुख्यमंत्री धामी यांच्यासोबत अक्षयने उत्तराखंडमधील युवावर्ग,तिथलं पर्यटन आणि इतर अन्य विषयांवर विस्तारीत चर्चा केली. बोललं जात आहे की,अक्षय कुमार सध्या मसुरीत आहे. तो गेले काही दिवस आपल्या शूटिंगच्या निमित्तानं तिथे तळ ठोकून आहे. तिथे त्याच्यासोबत अभिनेत्री रकुलप्रीत देखील शूटिंगसाठी पोहोचली आहे. अक्षय कुमारने मसूरी मधील बारलोगंज आणि इतर काही महत्त्वाच्या ठिकाणी आपल्या आगमी सिनेमाचं शूटिंग आतापर्यंत केलं आहे. जवळ-जवळ आठवडा झाला या अक्षय मसूरीत सिनेमाचं शूट करीत आहे. यादरम्यान मसूरीत झालेल्या बर्फवृष्टीत अक्षय आणि रकूलनं धम्माल केली त्यावेळचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.

Akshay Kumar, Pushkar Singh Dhami(Uttarakhand CM)
नशीब बलवत्तर म्हणून वाचल्या अभिनेत्री किशोरी शहाणे;काय झालं नेमकं?

यावेळी अक्षयला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी गर्दी केली खरी पण त्याला भेटता आलं नाही म्हणून ते नाराजही झाल्याचं बोललं जात आहे. खरंतर,मसूरीमध्ये शूटिंगच्या निमित्तानं अनेक कलाकारांचा राबता असतोच. तर काही कलाकार फक्त स्वतःचा मी टाईम-फॅमिली टाईम एन्जॉय करण्यासाठा देखील तिथे जात असतात. असो,आता मसूरीकरांनी नाराज व्हायचं काही कारण नाही. कारण आता काही दिवसांनी अक्षय त्यांचा शेजारी होणार म्हणजे रोज दिसणं,भेटणं होणारंच की.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com