''...तर पुरुषांना राखी बांधण्याची गरज भासणार नाही''; आयुषमानने दिला महत्वपूर्ण संदेश...

''...तर पुरुषांना राखी बांधण्याची गरज भासणार नाही''; आयुषमानने दिला महत्वपूर्ण संदेश...

मुंबई : आयुषमान खुराना हा त्याने केलेल्या विविध विषयांवरील चित्रपटांमुळे, विविध प्रकारच्या भूमिकांमुळे एक अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखला जातो. आयुषमानने आपल्या सर्व चित्रपटांद्वारे सातत्याने सामाजिक संदेश दिले आहेत. याशिवाय त्याची दुसरी ओळख म्हणजे त्याच्या कविता. जो आपल्या तेजस्वी कवितांच्या माध्यमातून नेहमीच समाजाला संदेश देतो. आता आपल्या कवितेच्या माध्यमातून त्याने असाच सामाजिक समस्यांशी संबंधित आपल्या देशवासीयांना महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. स्त्रियांना सगळ्या क्षेत्रात समान दर्जा असला पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली आहे.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने आयुषमानने समाजात खरा बदल घडवून आणण्याची इच्छा व्यक्त केली. या नवीन कवितेसह त्याने देशातील प्रत्येक नागरिकाला स्त्री सक्षमीकरण, महिला सक्षमीकरणासाठी जागृत केले आहे. या कवितेत आयुषमानचा भारताबद्दलचा दृष्टीकोन पूर्णपणे स्पष्ट आहे. "असा समाज निर्माण करा जिथे मुलींना आपल्या सुरक्षिततेसाठी भावाची गरज भासणार नाही, पुरुषांना प्रथा म्हणून राखी बांधण्याची गरज नाही," अशा आशयाची कविता आयुषमानने लिहिली आहे.

कवितेत तो लिहितो, ज्या मुलीला आपल्या संरक्षणासाठी आपल्या भावावर अवलंबून राहण्याची गरज नाही, असा समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येक भारतीयाने जोरदार प्रयत्न केले पाहिजेत. असे झाले तर पुरुषांना राखी बांधण्याची गरज भासणार नाही. अशी ही आशा त्याने आपल्या कवितेतून व्यक्त केली.

त्याच्या या कवितेला प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. अनेक लाईक्स, शेअर या कवितेला मिळाले आहेत. या कवितेच्या माध्यमातून आयुषमान पुन्हा एकदा हिरो बनला आहे.
---
संपादन : ऋषिराज तायडे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com