The Kashmir Files : चित्रपटावरून रंगलेला वाद नेमका काय?

The Kashmir Files Movie Controversy
The Kashmir Files Movie ControversySakal

मुंबई : विवेक अग्निहोत्रीचा काश्मीर फाईल्स चित्रपट (The Kashmir Files Movie) अल्पावधीतच लोकप्रिय झाला. यामध्ये काश्मीरमधून विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांवर झालेला अत्याचार दाखवण्यात आला आहे. अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आलाय, तर महाराष्ट्राच्या विधानसभेतही (Maharashtra Assembly) याचे पडसाद उमटले. इतकंच नाहीतर पंतप्रधान मोदींनी (PM Modi) देखील या चित्रपटाचा उल्लेख केलाय. पण, या चित्रपटावरून रंगलेला वाद नेमका काय (Kashmir Files Movie Controversy) आहे? ते आपण पाहुयात.

The Kashmir Files Movie Controversy
काश्मीर फाईल्सवरून वाद रंगला असताना अनुपम खेरचं जुनं ट्विट व्हायरल

नेमका वाद काय? -

विवेक अग्निहोत्रीच्या काश्मीर फाईल्स या चित्रपटाचं काहींनी कौतुक केलंय, तर काहींनी टीका केला आहे. काहीजण हा चित्रपट पाहायलाच हवा, असा आग्रह सोशल मीडियावरून धरत आहेत. तसेच स्वतः पंतप्रधान मोदींनी देखील हा चित्रपट पाहायला हवा, असं म्हटलं. या चित्रपट धार्मिक ध्रुवीकरण करत असल्याचा आरोप काहींनी केला आहे. हा चित्रपट काल्पनिक आहे. पण, काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचं खरं वर्णन करतोय, असं काही समीक्षकांनी म्हटलंय, तर काहींनी एका धर्माला खलनायक ठरवून ध्रुवीकरण केलं जातंय, असं म्हटलं.

चित्रपटावरून भाजपवर धार्मिक ध्रुवीकरणाचा आरोप -

भाजपकडून या चित्रपटाचं समर्थन केलं जात आहे. अनेक मंत्र्यांनी आणि नेत्यांनी आपल्या ट्विटरवरून हा चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं आहे. त्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी टीका केली. ''भाजपाला काश्मीर पंडितांबद्दल प्रेम नाही. काश्मिरी पंडितांचं पलायन झालं त्यावेळी भाजप समर्थित व्ही. पी. सिंग सरकार होतं. काश्मीर फाईल्स चित्रपट समाजात दुही निर्माण करण्यासाठी बनवला आहे. यामागे भाजप आणि राजकीय डाव आहे. त्यामुळेच पंतप्रधानांसह सर्वजण या चित्रपटाचा उदोउदो करत आहेत'', असे आरोप सचिन सावंत यांनी केला.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले? -

पंतप्रधान मोदींनी देखील काश्मीर फाईल्स चित्रपट पाहण्याचा सल्ला दिला. तसेच हा अतिशय चांगला चित्रपट असल्याचं म्हटलं. इतकंच नाहीतर असे चित्रपट व्हायला हवेत, असंही ते म्हणाले. चित्रपटाचं परीक्षण करण्याऐवजी त्याचं श्रेय हिरावून घेण्याची मोहीम चालवली जात आहे. एक गट त्यासाठी काम करत असून हा चित्रपट रोखण्याचं षडयंत्र रचलं जातंय, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

'भाजपने काश्मिरी पंडितांसाठी काय केलं?' -

पंतप्रधान मोदी यांनी असे चित्रपट बनवायला पाहिजे असं म्हटलं. त्यानंतर काँग्रेसकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. देशाचे पंतप्रधान धार्मिक ध्रुवीकरण करणारे चित्रपट बनवायला सांगतात, अशी टीका विरोधकांकडून करण्यात आली. तसेच गेल्या ८ वर्षांत भाजपने काश्मिरी पंडितांसाठी काय केलं? असा सवाल काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com