Lata Mangeshkar: दीदींच्या मनात 'ती' खंत शेवटपर्यत राहिली...

वयाच्या ९३ व्या वर्षी कोरोनानं त्यांचं मुंबईत निधन झालं आहे.
Lata Mangeshkar: दीदींच्या मनात 'ती' खंत शेवटपर्यत राहिली...

गानसम्राज्ञी लता मंगेशकर म्हणजे भारताला मिळालेली एक दैवी देणगी. सुरांचा हा एक अध्याय आज संपला खरा पण आयुष्यभरासाठी एक मौलिक देणगी प्रत्येकाला देवून गेलाय हे नक्की. भारतरत्न लता मंगेशकर यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी मुंबईतील ब्रीचकॅंडी इस्पितळात अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या महिन्याभरापासून कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेली अनेक दिवस तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्या दरम्यान त्यांची तब्येत वर-खाली होत होती पण त्यानंतर मात्र त्यांच्या तब्येतीत सुधारणा दिसून आली होती. काहीच दिवसांपूर्वी त्यांचे व्हेंटिलेटरही काढण्यात आले होते. आणि लवकरच त्यांना इस्पितळातून घरी सोडले जाईल असंही सांगण्यात येत होतं. पण अचानक काल रात्री त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्या कारणानं पुन्हा त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आले. अखेर आज सकाळी आठच्या सुमारास मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले आहे.

Lata Mangeshkar: दीदींच्या मनात 'ती' खंत शेवटपर्यत राहिली...
अभिषेक बच्चन सिनेमात येण्याआधी तुटपूंज्या कमिशनसाठी करायचा 'हे' काम

लता दिदींच्या अशा खुप आठवणी मनात आहेत ज्या त्यांच्या मुलाखतीच्या निमित्तानं ऐकण्याचा योग आला होता. एकदा त्या म्हणाल्या होत्या,''माझ्या मनात एक खंत कायम राहील''. आता त्यांच्या या बोलण्यार आपण सगळेच विचार करू नाही का. एवढ्या मोठ्या महान व्यक्तिमत्त्वाला कसली बरं खंत. आज आपल्या गुणांच्या,मेहनतीच्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संगीत उपासनेच्या बळावर त्यांनी सगळं तर मिळवलंय, मग कसली खंत. हो,त्यांना खंत होती शास्त्रीय संगीत मनासारखं गायला मिळालं नाही या गोष्टीची. त्या म्हणाल्या होत्या''मी सिनेमात शास्त्रीय संगीत गायलंय. पण तसं गाण्यात काहीच अर्थ नाही. खरं शास्त्रीय संगीत तर वेगळंच असतं. त्यातला आनंद काही औरच. मला सिनेसंगीतात व्यस्त झाल्यामुळे शास्त्रीय संगीतासाठी जसा रियाज करणं अपेक्षित असतं तसा रियाज कधीच करायला वेळ मिळाला नाही. त्यामुळे शास्त्रीय संगीत हवं तसं न गायल्याची खंत कायम माझ्या मनात राहील''.

Lata Mangeshkar: दीदींच्या मनात 'ती' खंत शेवटपर्यत राहिली...
अखेर हृतिकनं सबाचा हात हातात धरून दिली 'त्या' गोड नात्याची कबुली

तेव्हा सिनेसंगीतात इतकं मोठं नाव झाल्यानंतरही त्या म्हणाल्या होत्या,''सिनेमातलं गाणं हे काही गाणं नाही. खरं तर पहिला दर्जा हा नेहमी शास्त्रीय संगीताचा,त्यानंतर सुगम संगीत आणि मग सिनेसंगीत. आणि नेमकं त्या शास्त्रीय संगीताला पुरेपुर आत्मसात करण्यासाठी वेळेअभावी मी मुकले याची सल कायम मनात राहणार. माणूस कधीच परिपूर्ण होत नाही. या मताची मी असल्यानं मला माहित आहे मला मरेपर्यंत शिकायचं आहे. त्यामुळे मला सगळं येतं असं मी कधीच म्हणत नाही,म्हणणारही नाही. वेळ आहे,सुंदर आयुष्य आहे, मी माझं गाणं माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत जपणार''...असं त्या त्यावेळी म्हणाल्या होत्या. आपल्यातनं हा सुवर्ण स्वर आज हरपला असला तरी त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून त्या कायम आपल्या सोबत राहणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com