
Sanya Malhotra: 'दंगल' पासून सुरु झालेला अभिनेत्री सान्या मल्होत्राचा प्रवास हा आता 'कटहल' पर्यंत येऊन थांबलेला आहे. सान्याचा नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला 'कटहल' हा सिनेमा दोन आठवड्यापूर्वीच रिलीज झालाय आणि सिनेमाला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे.
सान्यानं आतापर्यंत केलेल्या तिच्या सिनेमांचा एकंदरीत आलेख पाहता त्याच्यात खूप वैविध्य दिसून येतं. एका विशिष्ट पठडीत तिच्या सिनेमांच्या कथा कधीच बांधलेल्या दिसल्या नाहीत. मग आमिर खानसोबतचा तिचा 'दंगल' असो की आयुष्मान खुराना सोबतचा 'बधाई हो' असो की आताचा 'कटहल' सिनेमा असो..
सान्याची सिनेमांची चॉईस खूप हटके राहिली आहे. अर्थात सिनेमांच्या कथांसोबतच तिचा सहज अभिनय हा देखील प्रेक्षकांचे प्रेम मिळवण्यात महत्त्वाचा ठरला. (Sanya Malhotra speaks about Nagraj Manjule and marathi Movie)
सान्यानं नुकतीच ईसकाळला मुलाखत दिली त्यात तिनं आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याविषयी मोकळेपणानं संवाद साधला. या मुलाखतीत तिनं खास मराठी भाषाच नाही तर मराठी सिनेमांवरचं आपलं प्रेमही व्यक्त केलं.
सेटवर मराठी शब्दांचा सहज वापर होतो आणि ते खास शब्द कोणते याविषयी देखील सान्या मल्होत्रा बोलली. सान्यानं दिग्दर्शक नागराज मंजुळे याचे सिनेमे आपल्याला खूप आवडतात हे सांगताना त्याचा 'सैराट' सिनेमा आपण किती वेळा पाहिलाय याविषयी आकडा सांगत हैराण करून सोडलं.
सान्यानं या मुलाखतीत नागराज सोबत काम करण्याची संधी मिळाली तर आपल्याला आवडेल असं देखील स्पष्ट केलं. सध्या बॉलीवूडमध्ये देखील मध्यवर्ती व्यक्तिरेखा महाराष्ट्रीयन दाखवण्याचा फंडा यशस्वी झाला आहे,त्यामुळे आपल्याला जर अशी एखादी व्यक्तिरेखा ऑफर झाली तर ती मराठी मुलगी सिनेमात रंगवायला आवडेल असं देखील सान्या मुलाखतीत म्हणाली.
'बधाई हो' या तिच्या सिनेमाची कथा खूपच वेगळी होती,त्यामुळे असा सिनेमा बॉक्सऑफिसवर किती चालेल याविषयी शंका होती. तेव्हा सिनेमाला हो म्हणायला किती वेळ लावला याचा खुलासा देखील सान्या मल्होत्रानं मुलाखतीत केला. सान्या मल्होत्राच्या मुलाखतीची लिंक बातमीत जोडलेली आहे. नक्की पहा...