औरंगाबादेतील रस्त्याच्या निधीबाबत मंत्रालयातील अधिकारी म्हणतात, ‘कशात काहीच नाही’ !

रस्ता औरंगाबाद.jpg
रस्ता औरंगाबाद.jpg

औरंगाबाद : शहरातील रस्त्यांसाठी शासनाने महापालिकेला १५२ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. मात्र अद्याप निधीचे पत्र मिळाले नसल्यामुळे महापालिका व रस्ते विकास महामंडळाच्या हिश्‍श्‍याची रस्त्यांची कामे सुरू झालेली नाहीत. पत्रासंदर्भात महापालिकेचा पाठपुरावा सुरू असून, मंत्र्यालयातील अधिकारी मात्र ‘अजून कशात काहीत नाही... थांबा थोडे’ असे उत्तर देत आहेत. 


शहरातील १५२ कोटींच्या निधीतून महापालिका, एमआयडीसी व एमएसआरडीसी कामे करणार आहे. ‘एमआयडीसी़’ने पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या आदेशानुसार कामे सुरू केली आहेत. पण महापालिका व ‘एमएसआरडीसी’ला निधीबाबतच्या पत्राची प्रतीक्षा आहे. निधी उपलब्धतेचे पत्र शासनाकडून मिळावे, यासाठी महापालिकेकडून पाठपुरावा केला जात आहे; परंतु शासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

महापालिकेतील अधिकाऱ्याने निधीबद्दलची विचारणा करण्यासाठी बुधवारी (ता. ३०) मंत्रालयात अधिकाऱ्याला फोन केला असता, ‘अजून कशातच काही नाही, जरा थांबा’ असे उत्तर देण्यात आले. दरम्यान, नुकत्याच झालेल्या बैठकीत निधीवरून पालकमंत्र्यांनी ‘निधीच्या पत्राचे तुम्ही मला आता सांगताय का?’ असे म्हणत अधिकाऱ्यांना सुनावले होते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com