'तो' आजीसोबत नदीवर आला, वाटेतल्या पुलावरुन पाणी वाहत होते, क्षणात घडले असे की, काळजाचा थरकाप होईल !  

aayan.jpg
aayan.jpg

लासूर स्टेशन (औरंगाबाद) :  लासूरगाव (ता.वैजापूर) येथील शिवना नदीच्या पुलावरून पाण्यात पडलेल्या नऊ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता.दोन) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. नदीच्या प्रवाहामुळे हा सिमेंट पूल उखडला असून ठिकठिकाणी खड्डे तर स्लॅबचे गज उघडे पडले आहेत. आयान जुबेर शेख असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून तो चौथ्या वर्गात शिक्षण घेत होता.

आयान हा नदीच्या पाण्यात थोडस पुढं गेल्यानंतर खड्ड्यांमुळे अडकून तोल जाऊन थेट पाण्यात पडला. आजूबाजूला असणाऱ्यांनी शोधाशोध केली. परंतु अर्धा तास शोध करुनही तो मिळाला नव्हता. काही वेळाने तो मिळाला पण तो पर्यंत उशीर झाला. मुलाचे आईवडील वीटभट्टी कामगार असून आजी धूणे धुवायला नदीवर आली आणि तेव्हा तो आजीसोबत आला होता.

याबावत अधिक माहिती की, लासूरगाव येथील झोपडपट्टीत राहणारे जुबेर शेख हे पत्नी सज्जो यांच्यासह गावात विटभट्टीवर काम करतात. आजी नजमा बी या नदीवर धुणे धुण्यासाठी आल्या असता त्यांच्यासोबत आयान आला होता. पाण्याच्या प्रवाहात थोडा पुढे गेला परंतु पुलावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने तोल जाऊन थेट पाण्यात पडला. सध्या नदी दुथडी भरून वाहत असून आयान पडला त्या ठिकाणी नदीचे पात्र खोल असून पाणी जास्त आहे. संदिप देशमुख, अमोल नळे, दिपक हरिश्चंद्रे, विजय श्रीखंडे, शगिर मुल्ला, अजीम मुल्ला आदींनी शोध मोहिम राबवली. परंतु आयान सापडला नाही. अंदाजे अर्धातासाचा काळ लोटला होता. त्यानंतर दिसून आला. आयानला लासूर स्टेशन येथील दवाखान्यात तात्काळ नेण्यात आले परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

धोकादायक पुलाची बातमी सकाळने केली होती प्रकाशीत

शिवना नदीच्या पुलावर खड्डे निर्माण झाले असून भगदाड पडून गज उघडे पडल्याची बातमी 'सकाळ' ने नुकतीच प्रकाशीत केली होती. नदीवरील फरशी पुलावरून सातत्याने पाणी वाहत असून पाण्याचे प्रमाण कमीजास्त होत असल्याने ग्रामस्थांना पाण्याचा अंदाज घेऊन येजा करावी लागते. या फरशी पुलावरील सिमेंट स्लॅब ठिकठिकाणी निघाला असून लोखंडी गज उघडे पडले आहेत. पुलादरम्यान बहुतांश ठिकाणी हा रस्ता उखडला आहे. तर मोठे मोठे खड्डे झाल्याने अंदाज येत नसल्याने अनेक दुचाकीस्वार व पादचारी अपघात होऊन पडत आहेत. लासूर स्टेशनला जाण्यासाठी या पुलावरून जावे लागते. त्यामुळे सतत वर्दळीच्या या पुलाला भगदाड पडल्याने वाहतूक कोंडी होत आहे. या फरशी पुलाची तातडीने दुरुस्ती करून उंची वाढवावी अशी मागणी असून आयानच्या या अपघाती मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com