कोरोना संसर्गापासून बालकांना ठेवता येईल दुर  

photo
photo

औरंगाबाद : जगभर थैमान घातलेल्या कोरोनामुळे नवजात बाळ आणि बारा वर्षाखालील मुले यांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. ही काळजी नेमकी कशी घ्यावी, काय करावे आणि काय करु नये याची माहिती बालरोगतज्ञ डॉ. मंजुषा शेरकर यांनी दिली. वैयक्तिक स्वच्छता आणि विषाणूंचे संक्रमण थांबविणे ही उपायांमधील महत्त्वाची गुरुकिल्ली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 
कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव ही जागतिक साथ म्हणून जाहिर करण्यात आलेली आहे. कोरोना म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीची ही परीक्षाच आहे. बारा वर्षाखालील मुले आणि वयस्कर नागरिकांना अधिक भिती आहे. लहान मुलांमध्ये शरीराच्या आकाराच्या मानाने विषाणूंचा भार जास्त होऊ शकतो. 

अशी आहेत मुख्य लक्षणे 

कोरोना बाधित व्यक्तीत आढळली जाणारी मुख्य लक्षण म्हणजे विषाणूजन्य आजारात आढळणाऱ्या लक्षणे सारखीच असतात. ताप, अंगदुखी, कोरडा खोकला, घशात खवखव आणि पुढच्या टप्प्यात श्वास घेण्यास त्रास होणे ही प्रमुख लक्षण आहेत. आजाराच्या निदानासाठी घशातील द्रवाचे नमुने पाठविले जातात, रिपोर्ट येईपर्यंत त्या व्यक्तीला निगराणीखाली ठेवली जाते. 

असे आहेत उपाय 

प्रतिबंधात्मक उपायांमध्ये मुख्यतः हात स्वच्छ धुणे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे हे महत्त्वाचे आहे. साबणाच्या पाण्याने दर दोन-तीन तासांनी वीस सेकंद हात शास्त्रीय पद्धतीने स्वच्छ धुवावेत, नखे, बोटांमधील जागा, तळवे आणि मनगटही घासून स्वच्छ करावीत. वारंवार नाक तोंडाला स्पर्श करू नये, खोकताना थुंकीचे शिंतोडे वातावरणात पसरणार नाहीत, यासाठी स्वत:चा रुमाल वापरणे आवश्यक आहे. 

नवजात बाळाची अशी घ्यावी काळजी 

-हॉस्पिटल मध्ये नुकत्याच जन्मलेल्या नवजात बाळाला पाहण्यासाठी गर्दी करू नये 
-नवजात बालकांना आई आणि ठराविक नात्याशिवाय कोणीही हात लावू नये 
-स्वच्छ हात घेऊन अथवा हाताला सॅनिटायझर वापरून बाळाला स्पर्श करावा. 
-बाळाला आईचेच दूध पाजावे म्हणजे आपसूकच विषाणूपासून संरक्षण होईल. 
-बाळाला दिवसातून तीन वेळा स्वच्छ पुसून घ्यावे 
-शाळकरी वयाच्या मुलांना हात स्वच्छ ठेवण्याची सक्ती करावी. 
-खोकला झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा भरपूर पाणी प्यावे. 
-पोष्टीक सकस आणि नैसर्गिक आहार घ्यावा. जंकफूड अपायकारक ठरू शकतो 
-नर्सिंग होममध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी सर्जिकल मास्कचा वापर केला पाहिजे. 
-सर्दी-खोकला झालेल्या व्यक्तीपासून एक ते दीड मीटर अंतर अंतरावरुनच बोलावे. 
-स्पर्ष टाळावा तसेच बाहेरून मागवले जाणारे अन्नपदार्थ खाणे बंद करावेत. 


कापडी मास्क दिवसाअखेर जंतुनाशक मिसळलेल्या गरम पाण्यात स्वच्छ धुऊन कडक वाळवून दुसऱ्या दिवशी वापरावे. घरातील प्रत्येक कुटुंबीयांसह घरात काम करणाऱ्या महिला पुरुष ड्रायव्हर तसेच भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस हात धुण्याचा आग्रह करावा. 
डॉ. मंजुषा शेरकर, बालरोगतज्ज्ञ   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com