Twelfth Book
Twelfth Book

प्रतीक्षा संपली...बारावीच्या नविन अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके बाजारात

लातूर : राज्यातील बहुतांश महाविद्यालयाने बारावीचा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने शिकविण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे बारावीची पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांच्या हातात कधी पडणार? याकडे अनेक विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लक्ष लागले होते.

अखेर ‘बालभारती’ने बारावीची पुस्तके बाजारात आणण्यास सुरवात केली आहे. पहिल्या टप्प्यात विज्ञान शाखेची पुस्तके वितरीत केली जात आहेत. त्यानंतर येत्या काही दिवसांत वाणिज्य आणि कला शाखेची पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

राज्य मंडळाचा बारावीचा अभ्यासक्रम यंदा बदलण्यात आला आहे. त्यामुळे ही पुस्तके लवकर बाजारात आणण्याचा निर्णय बालभारतीने घेतला होता. त्यानूसार मार्च अखेरीस ही पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या. मात्र, कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सरकारने टाळेबंदी जाहीर केली. शिवाय, जिल्हा बंदी, वाहतूक बंदी हेही निर्णय सरकारने घेतले.

त्यामुळे पुस्तकांची दुकानेही बंद ठेवण्यात आली. अशा स्थितीत बारावीची नवी पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायची कशी, असा प्रश्न बालभारती समोर पडला. त्यामुळे सरकारने ‘बालभारती’च्या संकेतस्थळावरून पीडीएफ स्वरूपात पुस्तके उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. याला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसादही मिळाला. आता प्रत्यक्ष पुस्तके बाजारात आणली जात आहेत.

‘बालभारती’चे प्रभारी भांडार व्यवस्थापक शिवाजी खुर्दे म्हणाले, कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे बारावीची नवी पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यात अडचणी येऊ नयेत म्हणून आजवर पीडीएफ स्वरूपातील पुस्तके पोचविण्यात आली. आता प्रत्यक्ष पुस्तके पोचविण्यास सुरवात झाली आहे. सध्या बारावीची विज्ञान शाखेची सात पुस्तके आली आहेत.

यात मराठी, इंग्रजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित व संख्याशास्त्र (भाग एक), गणित व संख्याशास्त्र (भाग दोन) या पुस्तकांचा समावेश आहे. ती बाजारात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विज्ञान शाखेनंतर वाणिज्य आणि कला शाखेची पुस्तके बाजारात आणली जातील. विद्यार्थी-पालकांची बाजारात गर्दी होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

चारही जिल्ह्यातून ऑनलाईन मागणी
बारावीची पुस्तके घेऊन जाणाऱ्या विक्रेत्यांना ऑनलाईन पद्धतीने मागणी नोंदवायची आहे. ही पद्धत कोरोनामुळे यंदापासून सुरू केली आहे. आता कार्यालयात प्रत्यक्ष येऊन मागणी नोंदवायची गरज नाही. ऑनलाईन पद्धतीने मागणी नोंदवण्याबरोबरच ऑनलाईन पद्धतीने पैसेही भरता येणार आहेत.

त्यानंतर कुठल्या दिवशी आणि कुठल्या वेळेला पुस्तकांचा साठा घेऊन जायचे, याचा एसएमएस बालभारतीकडून संबंधीत विक्रेत्यांना पाठवला जात आहे. सध्या लातूरसह नांदेड, परभणी, उस्मानाबाद येथील विक्रेत्यांकडून पुस्तकांना चांगली मागणी आहे, असे शिवाजी खुर्दे यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com