आदिवासी जिल्ह्यात कोरोनाशी झुंजणाऱ्या डॉक्टरांची परवड; तुटपुंज्या पगारात करावं लागतंय काम... 

phc
phc

मुंबई :  राज्यातील 16 आदिवासी जिल्ह्यांमध्ये 281 भरारी पथकातील डॉक्टर‌ रुग्णसेवेचे काम करत आहेत. इतर डॉक्टर इथे सेवा देण्यासाठी जाऊ इच्छित नाही अशा आदिवासी दुर्जन पाड्यावर भरारी पथकातील डॉक्टरांच्या नेमणुका केल्या आहेत. 

1995 सालापासून हे भरारी पथक कामाला आहे. या डॉक्टरांना देण्यात येणारा पगारही राज्य सरकारचा आदिवासी विभाग आणि केंद्र सरकारचे राष्ट्रीय आरोग्य मिशन अशा दोन विभागाकडून दिले जाते. यात राज्य आदिवासी विभाग 6 हजार तर राष्ट्रीय आरोग्य विभाग 18 हजार असे मिळून 24 हजार रुपये मानधन दिले जाते. या मानधन वाढीसाठी गेली पाच वर्षे प्रयत्न केला जात आहे. मात्र आदिवासी विभाग सचिव टाळाटाळ‌ करत असल्याचे हे डॉक्टर सांगतात. 

विक्रमगड तालुक्यात सुमारे 2 लाख लोकसंख्या आहे. या ठिकाणी संसर्ग तीव्र होत असताना कठीण उपाय योजना राबवण्यात आले असल्याचे येथे कर्तव्यावर असलेल्या डॉ. शेषराव सूर्यवंशी यांनी सांगितले. सध्या विक्रमगड परिसरात 100 रुग्ण बाधित असल्याचे सांगण्यात आले. आदिवासी भागात अद्याप संसर्गाचे प्रमाण कमी असले तरीही संसर्ग रोखण्याचे आव्हान असल्याचे डॉ. सूर्यवंशी म्हणाले.

त्यामुळे आदिवासी जिल्ह्यात कोरोनाशी झुंजणाऱ्या पथकातील डॉक्टरांची परवड सुरु आहे. आधीच कोरोनासोबत लढा देऊन आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न करणारे डॉक्टर्स मात्र आजही आपल्या हक्काच्या पगारासाठी आजही झगडत आहेत. या डॉक्टरांना महिन्याला 24 हजार रुपये मानधनात काम करावे लागत आहे. हे डॉक्टर्स अडीच महिन्यापासून घरापासून दूर आदिवासी पाड्यांवर काम करत आहेत. मात्र राज्यातील कोणत्याही सरकारी डॉक्टरांच्या तुलनेत त्यांचा पगार निम्म्याहून कमी आहे. हा पगारही वेळेवर नसल्याचे ते डॉक्टर सांगतात. नुकतेच बंधपत्रित डॉक्टरांची पगार वाढ करण्यात आली. मात्र, या डॉक्टरांच्या‌ मानधन वाढीचा प्रश्न सरकारने गेली पाच वर्षे रखडवून ठेवला आहे. सध्या‌ आम्ही कुटुंब कशी जगवणार? असा सवाल भरारी पथकातील डॉक्टर सरकारला करत आहेत. 

आता हे काय नवीन; म्हणे 2011 वर्ल्डकपचा अंतिम सामना फिक्स होता.. वाचा कोणी केलाय हा आरोप...​

मानधन वाढीचा निर्णय झाला अंमलबजावणी नाही 
2015 साली या डॉक्टरांच्या मानधनवाढीबाबतचा निर्णय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. मात्र, तेव्हापासून या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. आदिवासी विभागातू दिल्या जाणार्या मानधनात वाढ व्हावी असा निर्णय झालेला आहे. सध्या दिल्या जाणार्या मानधनात 24 हजारांची वाढ करण्याचा निर्णय घेतला गेला आहे, असे डॉ. सूर्यवंशी म्हणाले.
 


सध्या अहोरात्र रुग्ण सेवा सुरु आहे. आम्ही अडीच महिन्यांपासून घरी गेलो नाहीत. गेल्या 15 ते 20 वर्षापासून अल्प मानधनावर काम करत आहोत. मात्र, आमची मानधन वाढ करत नाहीत. आता तर कोरोनाचे संकट सुरु असून आमच्यासह दुर राहणाऱ्या कुटुंबांचीही वाताहत सुरु आहे. काहीही सुविधा नसताना भरारी पथकातील डॉक्टर्स काम करत आहेत. त्यामुळे किमान आता तरी सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे हीच आमची मागणी आहे. 
- डॉ. शेषराव सूर्यवंशी, अध्यक्ष, अस्थायी मानसेवी वैद्यकीय अधिकारी संघटना महाराष्ट्र. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com