

Maharashtra Mantralaya rule
ESakal
मंत्रालयातील प्रशासकीय कामकाजाची गोपनीयता जपण्यासाठी आणि परिसरातील वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, मंत्रिमंडळाच्या बैठकांदरम्यान मंत्र्यांच्या कार्यालयातून केवळ एकाच अधिकृत व्यक्तीला मंत्रालयात प्रवेश दिला जाईल.