
मुंबई : अनंत चतुर्थीदिवशी राज्यभरात अनेक गणरायांच्या मूर्तीचे विसर्जन होणार असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. मुंबईतही सार्वजनिक मंडळासोबत अनेक घरघुती मूर्तींचेही विसर्जन होत आहे. सकाळपासूनच गणरायाचे विसर्जन मिरवणूक सुरू असून मुंबईत दुपारी १२ वाजेपर्यंत ४००हून अधिक मूर्तींचे विसर्जन झाल्याचे समोर आले आहे.