

Arvind Sawant railway issue demand
esakal
Mumbai Pandharpur train news : ‘गतिमान महाराष्ट्र, समृद्ध कोकण’ या ब्रीदवाक्याखाली मुंबईतील दादर येथे ‘महाराष्ट्र रेल्वे परिषद’ उत्साहात पार पडली. या परिषदेत राज्यातील रेल्वे प्रवासी संघटना आणि अभ्यासकांनी एकत्र येत कोकण रेल्वेचे विलिनीकरण, दुहेरीकरण आणि बंद पडलेल्या गाड्या पुन्हा सुरू करण्याबाबत आक्रमक पवित्रा घेतला.
खासदार अरविंद सावंत यांनी रेल्वे प्रशासनाला १० दिवसांची मुदत दिली असून, मागण्या मान्य न झाल्यास ३ मेनंतर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.