Mumbai News: खचाखच गर्दिमुळे लोकलमधून पडून प्रवाशाचा मृत्यू!
Mumbai News: धावत्या रेल्वेतून मुंब्रा रेतीबंदर पुलाच्या खाली पडून प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. २३) घडली. प्रसाद मुलिया (वय ३८) असे या प्रवाशाचे नाव आहे. (thane railway news)
प्रसाद मुलिया हे ठाकुर्ली येथील रहिवासी होते. सोमवारी ते मुंबईला जाण्यासाठी लोकलमधून प्रवास करत होते. गाडी मुंब्रा खाडी पुलावर आली असता ते खाली पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर व हातावर गंभीर दुखापत झाली.(mumbra news)
रेल्वे पोलिसांनी त्यांना ठाण्यातील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले; परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रेल्वेतील प्रचंड गर्दीमुळे दरवाजातून पडून त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप पारसिक प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश देसाई यांनी केला आहे. मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये कळवा मुंब्रादरम्यान प्रचंड गर्दी असते.
कल्याण ते ठाणे दरम्यानच्या सर्व स्थानकांतही प्रचंड गर्दी होते. गेल्या काही वर्षांपासून मुंब्रा व दिवा येथून नव्या गाड्या सुरू करण्याची मागणी करूनही रेल्वे प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील प्रवासी करत आहेत. याच कारणामुळे रेल्वेतून पडून गेल्या काही वर्षांत अनेक प्रवाशांचा बळी गेल्याचे सांगितले जात आहे.(kalyan thane local)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.