Sangli : इतिहासातील पहिलीच घटना! मिरजेत आंबेडकरांच्या नावाची पाडली कमान; पाटणकरांचा आंदोलनाचा इशारा

राज्याच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. यावर तोडगा न निघाल्यास राज्य या आंदोलकांच्या पाठीशी उभा करू.
Sangli Babasaheb Ambedkar
Sangli Babasaheb Ambedkaresakal
Summary

छ. शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्या नावाने बांधलेली कमान अचानक प्रशासनाने पाडली आहे.

सांगली : बेडग (ता. मिरज) गावात परवानगी घेऊन बांधलेली शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांच्या नावाने बांधलेली कमान अचानक प्रशासनाने पाडली आहे. याबाबत महिनाभर आंदोलन केले. मात्र, त्यांची कोणीच दखल घेतली नसल्याने बौद्ध समाजातील (Buddhist Community) ग्रामस्थांनी गावच सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Sangli Babasaheb Ambedkar
Kolhapur Flood : कोल्हापुरात पूरसदृश परिस्थिती; 59 बंधारे पाण्याखाली, आज-उद्या Yellow Alert

राज्याच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. यावर तोडगा न निघाल्यास राज्य या आंदोलकांच्या पाठीशी उभा करू, असा इशारा सर्व पुरोगामी संघटनांकडून देण्यात येत आहे, अशी माहिती डॉ. भारत पाटणकर (Bharat Patankar) यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी ॲड. सुभाष पाटील, प्रा. दादासाहेब ढेरे, धनाजी गुरव, बाबूराव गुरव, ज्योती अदाटे, दिगंबर कांबळे, विकास मगदूम, गौतम काटकर, सुरेश दुधगावकर, किरण कांबळे, डॉ. रवींद्र श्रावस्थी, डॉ. संपत गायकवाड, डॉ. संजय पाटील आदींसह पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Sangli Babasaheb Ambedkar
Kolhapur : तळ्याकाठी खेळताना मुलांना सापडली 24 लाख किमतीची सोन्याची बिस्किटे; 'त्यांना' सुगावा लागताच..

डॉ. पाटणकर म्हणाले, "बेडग येथे उभारलेली कामान पोलिस संरक्षणात पाडल्याने सगळे समाजबांधव घरांना कुलूप लावून गावाबाहेर पडलीत. ग्रामपंचायतीने २००२ मध्ये ठराव घेऊन परवानगी दिली. पुन्हा २००८ मध्ये लोकवर्गणीतून काम पूर्णचा परवाना दिला. ३ जानेवारी २०२३ रोजी ग्रामपंचायतीने पुन्हा जागा निश्चितीसह परवानगी दिली.

Sangli Babasaheb Ambedkar
Koyna Dam Update : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या 'कोयना'च्या पाणी पातळीत वाढ; धरणात 'इतक्या' TMC साठ्याची नोंद

त्यानंतर बांधकाम सुरू झाले, याला कोणीही गावातील लोकांनी विरोध केला नाही. मात्र, अचानक अधिकारी, पोलिस प्रशासनाने येऊन कमान पाडली. याविरोधात गावातील लोकांनी आम्हाला कोणी वाली नाही, म्हणून मंत्रालयाकडे कूच केली आहे.

गावातील लोक विरोध करत नाहीत, पण साथ मिळत नसल्याने गाव सोडण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला. गावागावांत शोषित समाज आहे, त्यामुळे वेगवेगळ्या पुरोगामी संघटना आम्ही सर्व लोक तुमच्या पाठीशी आहोत, आम्ही आमदार जयंत पाटील यांच्याशी संपर्क केला असून त्यांनी पाठपुराव्याचे आश्वासन दिले आहे.

Sangli Babasaheb Ambedkar
मोठी बातमी! 50 वर्षांपासून धगधगत असलेला बेळगाव सीमाप्रश्‍न सुटणार? 'ग्रामविकास'नं मागवली सीमेलगतच्या गावांची माहिती

पालकमंत्री, खासदारांनी काय केलं?

विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा पालकमंत्री सुरेश खाडे यांनी याबाबत कोणतीही भूमिका घेतली नाही. खासदार याबाबत काहीच केलं नाही, प्रशासनाने देखील भूमिका घेतली नाही, त्यामुळे आंदोलनाचा संविधानिक मार्ग निवडावा लागला, असे बाबूराव गुरव यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com