
कवी सौमित्र म्हणून प्रसिद्ध असलेले किशोर कदम यांनी त्यांच्या अधेरीतील घराबद्दल केलेल्या फेसबुक पोस्टनंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय. आपलं राहतं घर धोक्यात असून मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत करावी असं किशोर कदम यांनी म्हटलं होतं. या पोस्टची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून सहकार सचिव प्रवीण दराडे, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर या अधिकाऱ्यांना या प्रकरणी लक्ष घालण्यास सांगितल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.