पुणे-नाशिक लोहमार्गामुळे जमिनींना ‘अच्छे दिन’

Railway
Railway

चाकण - खेड तालुक्‍यात लॉकडाउननंतर पुन्हा जमिनींच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात वाढ होताना दिसत आहे. एमआयडीसीने पाचव्या टप्प्यासाठी सुमारे दोन हजार एकर जमीन संपादित केल्याने त्या टप्प्यात बहुराष्ट्रीय कंपन्यांचे लॉजिस्टिक पार्क उभे राहणार आहे. त्यामुळे तसेच प्रस्तावित पुणे-नाशिक लोहमार्गाचे काम येत्या दोन-तीन वर्षांत सुरू होणार असल्याची शक्‍यता वर्तविली जात असल्याने जमिनींची मागणी पुन्हा वाढली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खेड तालुक्‍यात चाकण औद्योगिक वसाहतीसाठी सुमारे दहा हजार एकरावर जमीन संपादित झाली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने संपादित केलेल्या जमिनींवर बहुराष्ट्रीय, राष्ट्रीय कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे चाकण औद्योगिक वसाहत जगात महत्त्वाची मानली जाते. 

लॉकडाउन उठल्यानंतर औद्योगिक वसाहतीच्या पाचव्या टप्प्यासाठी जमीन संपादन सुरू आहे. त्या संपादनात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झाल्या आहेत. त्या जमिनींना ही चांगला मोबदला मिळाला असल्याने अर्थचक्राला गती मिळाली आहे. त्याचबरोबर पुणे-नाशिक रेल्वेमार्ग होण्याच्या हालचाली रेल्वे मंत्रालयात सुरू आहेत. योग्य निधी मिळाल्यानंतर त्या लोहमार्गाचे कामही सुरू होणार आहे. 

नाशिक भागातील कांदा, द्राक्ष व इतर शेतीमाल निर्यात योग्य व देशांत हवा असतो तो माल रेल्वेने नेण्यासाठी पुणे-नाशिक लोहमार्गाची मोठी गरज आहे. तसेच चाकण औद्योगिक नगरी असल्याने कंपन्यांचा माल, कच्चा माल ने-आण करण्यासाठी लोहमार्गाची गरज आहे. तसेच प्रवासी वाहतूक महत्त्वाची आहे. हे ओळखून काही उद्योजक, नेते यांची रेल्वेमार्ग होण्याची मागणी आहे. रेल्वे मंत्रालयाने व राज्य सरकारने याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. 

चाकण परिसरातून लोहमार्ग जात असल्याने चाकणजवळ होणारे प्रस्तावित रेल्वे जंक्‍शन त्यामुळे त्या परिसरात जमिनींना येणारे महत्त्व त्यामुळे ही चाकण परिसरात जमिनींचे भाव वाढले आहेत. जमीन व्यवहारांत ही वाढ झाली आहे.

साठ हजारांवरून दोन कोटी
चाकण परिसरात गेल्या वीस वर्षांत जमिनींचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले ते एकराला साठ हजार रुपयांपासून एक कोटी, दोन कोटींपर्यंत गेले. वीस वर्षांपूर्वी सावरदरी गावात साठ हजार रुपये, एक लाख रुपये एकराने मिळणारी जमीन आता एकरी दोन कोटी रुपयांना मिळत आहे, हे वास्तव आहे. औद्योगिकीकरणामुळे जमिनींचे भाव वाढले.

चाकण औद्योगिक परिसरात बहुराष्ट्रीय कंपन्या मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या पाचव्या टप्प्यातील जमिनींचे संपादन सुरू आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या त्या ठिकाणी येणार आहेत. मोठा रोजगार निर्माण होणार आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीजवळील इंडस्ट्रिअल प्लॉटची मागणी वाढली आहे. त्याला भावही चांगला मिळत आहे.  
- राजेंद्र गायकवाड, उद्योजक

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com