विक्रम अवसरीकर, फायनान्शिअल प्लॅनर शेअर बाजारातील चढ-उतार हे रोखे (बॉँड) बाजारा-तील घडामोडींवरही अवलंबून असतात. देशाची अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी रोखे महत्त्वाची भूमिका बजावतात..१. बॉँड म्हणजे कर्जरोखे. सरकार कर्जरोखे विकते आणि लोकांना त्यावर व्याज देते. सरकारकडे कररूपाने उत्पन्न येते; पण ते देश चालवण्यासाठी पुरेसे नसते. आपण पोस्टात जाऊन राष्ट्रीय बचत पत्र घेतो; तसेच मोठमोठे गुंतवणूकदार म्हणजे बँका, मोठ्या कंपन्या, बाहेरचे देश हे रोखे विकत घेतात..२. या रोख्यांद्वारे सरकार अशा गुंतवणूकदारांना एक स्थिर व्याज देण्याचे मान्य करते. सरकारने या लोकांकडून घेतलेली ही रक्कम म्हणजे कर्जच असते.३. हे रोखे वेगवेगळ्या मुदतीचे असतात. एका दिवसापासून ४० ते ५० वर्षांचे. त्याचे व्याज हे त्याप्रमाणे कमी-जास्त होते..४. हे रोखे एका ठराविक रकमेचे असतात, त्याला त्या रोख्यांची फेस व्हॅल्यू किंवा दर्शनी मूल्य म्हणतात. त्यावर मिळणाऱ्या व्याजदराला कुपन रेट म्हणतात. या रोख्यांचा शेअरप्रमाणे व्यवहार करता येतो.५. समजा, १०० रुपये दर्शनी मूल्याचा रोख्यांसाठी नऊ टक्के कुपन रेट आहे, तर ग्राहकाला नऊ रुपये व्याजाचे उत्पन्न मिळते. बाजारात विकले जात असल्याने बाजारातली किंमत १०० रुपयांपेक्षा कमी झाली, तरी ग्राहकाला मॅच्युरिटीला १०० रुपये मिळतात..६. सरकार जेव्हा व्याजदर वाढवते, तेव्हा बाजारात कमी व्याज दराने विकलेले रोखे आधीपासून असतात. सरकारने नऊ टक्क्यांचा व्याजदर वाढवून १० टक्के केला, तर नऊ टक्के दराच्या कर्जरोख्यांची मागणी कमी होते. व्याजदराच्या उत्पन्नाला यिल्ड म्हणतात.७. समजा, १०० रुपयांवर नऊ टक्क्यांप्रमाणे नऊ रुपये मिळणाऱ्या रोख्यांना मागणी नसल्याने बाजारभाव कमी होऊन ९० रुपये झाला असेल, तर जो ग्राहक ९० रुपयाला ते रोखे विकत घेईल त्याला १०० रुपये दर्शनी किमतीचे रोखे ९० रुपयाला पडतात; पण त्यावर व्याजदर आधीचेच असल्याने त्याला ९० रुपयाला नऊ रुपये मिळतात म्हणजे १० टक्के दराने व्याज मिळते. येथे ग्राहकाचे उत्पन्न वाढले; पण ज्याने १०० रुपयाचे रोखे ९० रुपयाला विकलेले असतात त्याचे नुकसानच होत असते. आता जेव्हा सरकारला नवे रोखे अधिक व्याजदराने काढावे लागतात, तेव्हा तेव्हा सरकारवरील देणे वाढते..८. रोख्यांवरचे उत्पन्न जेव्हा ग्राहकांसाठी वाढलेले असते, तेव्हा त्या रोख्यांची किंमत कमी झालेली असते, हे आपण बघितले. अधिक दराने रोखे उपलब्ध असतील, तर शेअर बाजारातील पैसा या रोख्यांकडे वळवला जातो.९. सरकारला अधिक दराने व्याज द्यावे लागत असल्याने सरकारी उत्पन्न वाढवण्यासाठी जिथे जिथे सरकार कर्ज देत असते, तिथले व्याजदर सरकारला वाढवावेत लागतात. याचा परिणाम म्हणून कंपन्यांना कर्ज जास्त व्याजदराने घ्यावे लागते, हे परवडतेच असे नाही..१०. एकंदरीतच पैसे कमावण्यासाठी पैसे गुंतवण्याचे प्रमाण कमी होते आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो.रोखे बाजार प्रचंड मोठा आहे. सध्या अमेरिकेत व्याजदर वाढले आहेत. अमेरिकेवर गुंतवणूकदारांचा भरवसा असल्याने ते भारतातील गुंतवणूक काढून काही प्रमाणात अमेरिकी रोख्यांमध्ये गुंतवत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.