Sunroof Cars : सनरूफ कार फक्त दिखावा असतो का?

या कार भारतात खूप पसंत केल्या जातात. सनरूफच्या नावाखाली ग्राहकांचा पाण्यासारखा पैसाही उधळला जातोय
Sunroof Cars
Sunroof Carsesakal

Sunroof Cars : भारतातील कार मार्केट हल्ली वेग घेऊ लागलंय. लोकांच्या हातात पैसे आल्याने लोक मोठ्या संख्येने नवीन कार खरेदी करत आहेत. शिवाय हे लोक फीचर्सच्या बाबतीत अजिबातच तडजोड करायला तयार नसतात. आणि त्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्यास तयार असतात. आता सनरूफ कारच्या बाबतीतही असंच आहे. या कार भारतात खूप पसंत केल्या जातात. सनरूफच्या नावाखाली ग्राहकांचा पाण्यासारखा पैसाही उधळला जातोय.

पण भारताच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर सनरूफ कार खरेदी करणं खरोखरच फायदेशीर असतं का? आज आपण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

सनरूफ ही संकल्पना पाश्चिमात्य देशांसाठी आली आहे. वास्तविक, युरोप सारख्या प्रदेशातील हवामान खूप थंड आहे. लोकांना उबदार वाटावं यासाठी कार कंपन्यांनी सनरूफ कार आणल्या. सनरूफमुळे सूर्यप्रकाश थेट कारमध्ये येऊ शकतो, ज्यामुळे ग्राहकांना थंडीची अनुभूती मिळते.

सनरूफची किंमत खूप जास्त आहे

मात्र, भारताचे हवामान पाश्चिमात्य देशांसारखे नाही. येथे बहुतांशी उष्णता असते. सनरूफ कारवर पैसे खर्च करणे भारतीय हवामानासाठी चांगले नाही. देशातील कार कंपन्या मोठ्या थाटात सनरूफ देत असतात. आणि ग्राहक देखील सनरूफच्या मोहात पडतात आणि सनरूफ नसलेल्या कारपेक्षा सुमारे 50,000-80,000 रुपये जास्त खर्च करतात. (Technology)

Sunroof Cars
‘सनरूफ’मुळं कारची बांधणी कमकुवत होते का? : Sunroof

भारतात सनरूफ कार का खरेदी करू नयेत याची काही कारणं आहेत..

1. कारच्या सुरक्षिततेसाठी सनरुफ चांगले नाही. लोकांना कारच्या खिडक्या बंद करून गाडी चालवणे आवडते. जेणेकरून धूळ, घाण आणि सूर्यप्रकाशापासून सुटका होईल. पण सनरूफ उघडले तर या तिन्ही गोष्टी गाडीच्या आत येतील. एसीसारख्या कारच्या पार्टमध्येही धूळ आणि घाण साचू शकते. (Car)

Sunroof Cars
Sunroof Use : कारच्या बाहेर डोक्यावण्यासाठी नाही तर या कारणासाठी असतं सनरूफ

2. भारतातील हवामान उष्ण आहे आणि जेव्हा तुम्ही सनरूफ उघडता तेव्हा सूर्यप्रकाशाचा थेट कारवर परिणाम होतो. गाडी आतून गरम होऊ लागते.

3. सनरूफ बराच काळ उघडण्यात काही अर्थ नाही. यात पाणी शिरण्याचाही धोका आहे. पाऊस पडत असताना तुम्ही सनरूफचा आनंद घेऊ शकत नाही, कारण कारमध्ये पाणी शिरल्याने केबिनचे नुकसान होऊ शकते.

4. कारचे सनरूफ उघडे असेल तर आवाज येतो. त्यामुळे गाडी चालवताना समस्या निर्माण होऊ शकतात. आवाज टाळण्यासाठी सनरूफ बंद ठेवणे चांगले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com