The state has decided to start classes IX to XII from November 24.jpg
The state has decided to start classes IX to XII from November 24.jpg 
अहमदनगर

शिक्षकांच्या चाचणीनंतरच आठवीपर्यंतचे वर्ग भरणार

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : शिक्षण विभागाने नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केल्यावर, आता 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास शासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे पाचवी ते आठवीपर्यंतच्या 6614 शिक्षकांच्या कोरोनाचाचणी होणार आहे; परंतु या चाचण्यांचा अहवाल आल्यानंतर वर्ग भरविले जाणार आहेत. 

राज्यात 24 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय झाला. टप्प्याटप्प्याने राज्यातील शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, त्याअगोदर शिक्षकांची कोरोनाचाचणी करण्यात आली. कोरोनाचाचणीचे अहवाल जिल्ह्यातील शिक्षकांना वेळेत मिळण्यासाठी जिल्हा रुग्णालयाचे उंबरठे झिजविण्याची वेळ आली होती.

अनेकांना घशातील स्त्राव दिल्यानंतर तब्बल दहा दिवसांनी अहवाल मिळाले. त्यामुळे यावेळी तरी प्रशासनाने नियोजन करून शिक्षकांना कोरोना चाचणी करावी व तपासणीनंतर तातडीने दुसऱ्या दिवशी अहवाल मिळावेत, अशी मागणी होत आहे. पाचवी ते आठवीपर्यंत जिल्ह्यात 2003 शाळा असून, 3 लाख 7 हजार 777 विद्यार्थीसंख्या आहे. त्यांना 6614 शिक्षक अध्यापनाचे काम करतात.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Paneer Stuffed Chilla: विकेंडला बनवा पनीर स्टफ चिला, नोट करा रेसिपी

Sakal Podcast : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदुरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 मे 2024

SCROLL FOR NEXT