The state has decided to start classes IX to XII from November 24.jpg 
अहिल्यानगर

शिक्षकांच्या चाचणीनंतरच आठवीपर्यंतचे वर्ग भरणार

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : शिक्षण विभागाने नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केल्यावर, आता 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास शासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे पाचवी ते आठवीपर्यंतच्या 6614 शिक्षकांच्या कोरोनाचाचणी होणार आहे; परंतु या चाचण्यांचा अहवाल आल्यानंतर वर्ग भरविले जाणार आहेत. 

राज्यात 24 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय झाला. टप्प्याटप्प्याने राज्यातील शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, त्याअगोदर शिक्षकांची कोरोनाचाचणी करण्यात आली. कोरोनाचाचणीचे अहवाल जिल्ह्यातील शिक्षकांना वेळेत मिळण्यासाठी जिल्हा रुग्णालयाचे उंबरठे झिजविण्याची वेळ आली होती.

अनेकांना घशातील स्त्राव दिल्यानंतर तब्बल दहा दिवसांनी अहवाल मिळाले. त्यामुळे यावेळी तरी प्रशासनाने नियोजन करून शिक्षकांना कोरोना चाचणी करावी व तपासणीनंतर तातडीने दुसऱ्या दिवशी अहवाल मिळावेत, अशी मागणी होत आहे. पाचवी ते आठवीपर्यंत जिल्ह्यात 2003 शाळा असून, 3 लाख 7 हजार 777 विद्यार्थीसंख्या आहे. त्यांना 6614 शिक्षक अध्यापनाचे काम करतात.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : तेजस्वी यादवसह चौघांविरोधात 'FIR' दाखल; जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Photography Competition : पर्यटनस्थळे ‘क्लिक’ करा, पाच लाखांचे बक्षीस मिळवा; शंभूराज देसाई यांची माहिती

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

SCROLL FOR NEXT