कलेक्टर कार्यालयाजवळ सुविधांची वाणवा
कलेक्टर कार्यालयाजवळ सुविधांची वाणवा sakal
अहमदनगर

अहमदनगर : कलेक्टर कार्यालयाजवळ सुविधांची वाणवा

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन वास्तूने शहरासह जिल्ह्याच्या वैभवात भर घातली आहे. मात्र, या इमारतीत कार्यालयीन कामकाज सुरू झाल्यापासून कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. येणाऱ्या नागरिकांना जवळ बँक नाही, झेरॉक्सची सुविधा नाही, की पिण्यासाठी पाण्याची चांगली सुविधा नाही. त्यामुळे मोठा मनस्ताप होत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय शहरातून नगर-औरंगाबाद राज्य महामार्गावरील नवीन वास्तूत स्थलांतरित होऊन सहा महिन्यांचा कालावधी लोटलेला आहे. या नवीन वास्तूत जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वच कार्यालये स्थलांतरित झालेली आहेत. तेव्हापासून जिल्ह्यातील नागरिकांचे हाल सुरू झालेले आहेत. ते अद्यापही कायम आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात येण्यापासून

ते तेथून माघारी घरी निघेपर्यंत सर्वसामान्य नागरिकांना हाल सहन करावे लागत आहेत. शहरापासून जिल्हाधिकारी कार्यालय दूर असल्यामुळे जिल्ह्यातील चौदा तालुक्यांपैकी १३ तालुक्यांतील नागरिकांना अव्वाच्या सव्वा पैसे देऊन कार्यालयात जावे लागत आहे. तसेच, कार्यालयात गेल्यानंतर कोणत्या मजल्यावर जायचे, याची माहिती लिफ्टमध्ये लावलेली नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. तेथे लिफ्टमध्ये सूचना फलक असणे गरजेचे आहे. तसेच कार्यालयात निवेदने देताना अनेकदा झेरॉक्सची आवश्यकता भासते. त्या एका झेरॉक्ससाठी नागरिकांना एक ते दीड किलोमीटर पायपीट करावी लागते. येथे उपाहारगृहाची सोय केलेली आहे. मात्र, त्याची निविदा अद्याप निघालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांसह सर्वांनाच चहापासून ते जेवणापर्यंतची गैरसोय सहन करावी लागत आहे.

काही कर्मचाऱ्यांसाठी जुन्या कार्यालयाच्या परिसरातून अद्यापही चहा येत आहे. मात्र, त्याची वेळ ठरलेली आहे. इतर वेळी मात्र तो उपलब्ध होत नाही. माहिती अधिकारात माहिती घेताना, अनेकांना त्याचे शुल्क भरावे लागते. त्यासाठी जवळपास बँक नसल्याने गैरसोय होत आहे. प्रशासनाने नागरिकांची होणारी गैरसोय ओळखून ती दूर करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पार्किंगची सुविधा असूनही वाहने सर्वसामान्यांना बाहेर उभी करायला लावली जातात. त्याचा मनस्ताप अनेकांना होत आहे. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

या आहेत असुविधा

नागरिकांना कार्यालयाच्या आवारात पार्किंगला मज्जाव

कार्यालयाच्या परिसरात झेरॉक्सची सोय नाही

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळपास बँक नाही

उपाहारगृह नसल्याने चहा व नाश्त्याची सोय नाही

लिफ्टमध्ये कोणते दालन कितव्या मजल्यावर सूचना फलक नाही

पिण्याचे पाणी उपलब्ध, पण ग्लास नाहीत

उपाहारगृहाअभावी हाल

जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारतीची उभारणी करताना येथे उपाहारगृहासाठी हॉलची निर्मिती करण्यात आलेली आहे. मात्र, नवीन वास्तूत कार्यालय येऊन सहा महिन्यांपेक्षा जादा कालावधी लोटला तरी अद्याप उपाहारगृह सुरू करण्यासंदर्भात निविदाप्रक्रिया न झाल्याने सर्वांचीच गैरसोय होत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन वास्तूच्या कामास आम्ही सुरवातीपासून विरोध केला होता. विरोध डावलत प्रशासनाने इमारत बांधली आहे. तशाच प्रकारे नवीन वास्तूत नागरिकांना सुविधा देणे गरजेचे आहे. झेरॉक्स, बँकेत पैसे भरणे आदींसाठी एक ते दीड किलोमीटर पायपीट करावी लागते. वेळ व पैसा जाऊन मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच पिण्यास पाणी आहे, मात्र ते प्यायला ग्लास नसल्याने नागरिकांची कुचंबणा होत आहे.

- सुधीर भद्रे, जिल्हाध्यक्ष, भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT