farmer-crop
farmer-crop sakal
अकोला

अकोला : बळीराजाच्या स्वप्नाचा चुराडा; भाव पडले अन् मालही गेला

सकाळ वृत्तसेवा

रिसोड : केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी नीतीचा तसेच, निसर्गाच्या अवकृपेचा बळीराजाला चांगलाच फटका बसला आहे. १२ हजार रुपये क्विंटल सोयाबीनला भाव सुरू असतानाच केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात सोयापेंड आयात केल्याने सोयाबीनचा भाव अवघ्या साडेचार हजारावर येऊन ठेपला आहे. यंदाच्या पावसाळ्यात सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे बळीराजांनी रंगविलेले सोनेरी स्वप्नं भंग झाली आहेत.

यंदा भरघोस उत्पन्न पीकवून डोईवर असलेले बँकेचे, सावकारी कर्ज फेडून मुला- मुलींचे शिक्षणाबरोबर त्यांचे लग्न करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पदरी घोर निराशा पडली आहे. त्यासाठी घेतलेल्या कर्जाचे साधे व्याज देता येणार नाही अशी, बिकट परिस्थिती निसर्गाच्या लहरीपणामुळे बनली आहे. विवाहयोग्य मुलीचे हात पिवळे कसे करायचे? व अशा खडतर प्रसंगातून संसाररुपी गाडा कसा हाताळायचा? याच विवंचनेत देशाचा पोशिंदा समजणारा शेतकरी राजा आज मरणासन्न अवस्थेत जगत आहे.

शासनाने सध्या राज्यात गाजत असलेला सारीपाटाचा खेळ दूर सारून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देणे व त्यांना आर्थिक सक्षम कसे करता येईल? याची काळजी घेणे नितांत गरजेचे आहे. कोरडवाहू शेतीवर अवलंबून असणाऱ्या बळीराजाला कधी अतिवृष्टी, कधी अवर्षणाचा फटका गेल्या दशकापासून बसत आहे. यंदा बियाणे, रासायनीक खते यासह सोयाबीनच्या बियाणांच्या किमतीत विक्रमी वाढ झाल्याने पेरणी करताना शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. एकीकडे महागडे बियाणे, रासायनीक खते असताना केलेली पेरणी फिस्कटली व दुबार, तिबार पेरणीचे संकट म्हणून शेतकऱ्यांच्या समोर उभे ठाकले होते. पुन्हा सावकाराचे उंबरठे झिजवत दुबार पेरणी केली. निसर्गाच्या कोपामुळे या- ना- त्या कारणाने सावकाराचे व बँकेचे कर्ज फेडता येईल एवढे सोयाबीन, मूग या पिकांचे उत्पन्नही बळीराजाच्या पदरी पडताना दिसत नाहीत.

पंचनामे झाले गायब

शासनाच्या नियमानुसार ६५ मिलीमीटर पाऊस झाला तर, तो अतिवृष्टीत बसतो. गत पंधरा दिवसांपासून दररोज मुसळधार पाऊस बरसत आहे, निकषाची मर्यादा ओलांडली आहे. तीस टक्के जमिनीवर अजूनही पाणी आहे. उभ्या सोयाबीनला कोंब फुटले आहेत. मात्र, जिल्ह्यात कोठेच पंचनामे होताना दिसत नाहीत. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घोषणा केली मात्र, आदेश आले नसल्याने प्रशासन आदेशाची वाट बघत आहेत. तर, शेतकरी पावसाच्या उघडीपीची वाट बघत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madha Loksabha: मावळत्या सूर्याची शपथ अन् शरद पवार... मोदींची टीका; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

मोहन जोशींना झाला होता मालिका सोडल्याचा पश्चाताप; जाणून घ्या शूटिंगदरम्यानचा 'तो' भन्नाट किस्सा...

Aamir Khan: "मुसलमान असल्यामुळे मला नमस्कार करण्याची सवय नव्हती पण..."; आमिरनं सांगितला पंजाबमधील 'तो' किस्सा

वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टमधील गंभीर आरोपांवर भारताचे सडेतोड उत्तर; काय करण्यात आलाय दावा?

SCROLL FOR NEXT