अकोला : शिक्षण विभाग व शासनाला केलेल्या इंग्रजी शाळांविषयीच्या मागण्याच्या संदर्भात शासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षाच्या विरोधात आरटीई फाउंडेशन, ईसा, वेस्टा, मेसा, पुस्मा आदी संघटना एकत्र आल्या आहेत. जोपर्यंत गेल्या चार वर्षांपासून बाकी असणाऱ्या आरटीई फीचा परतावा मिळत नाही तो पर्यंत नवीन आरटीई प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात न राबविण्याचा निर्णय या संघटनांनी घेतला आहे. या बाबत सर्व संघटनांच्या वतीने नागपूर येथील संविधान चौकात धरणे आंदोलन देखील सुरू करण्यात आले आहे.
कोविड-१९च्या प्रकोपामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळा प्रचंड आर्थिक संकटात सापडल्या आहेत. त्यात गेल्या चार वर्षात आपल्या हक्काचा आरटीई प्रवेश शुल्काचा परतावा देखील शासन देत नाही आहे. परिनामी अनेक शाळा बंद होत आहेत आणि संस्थाचालक आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत.
त्यामुळेच २०१७-१८ ते २०-२१ या चार वर्षांची प्रतिपूर्ती जोपर्यंत राज्यातील शाळांना मिळत नाही तो पर्यंत राज्यातील सर्व शाळा आरटीई प्रवेश देणार नसल्याची भूमिका या सर्व संघटनांनी घेतली आहे.
या संदर्भात शिक्षण विभागाला वारंवार निवेदने देऊन देखील कुठलीच कार्यवाही न करण्यात आल्याने ही टोकाची भूमिका घ्यावी लागत असल्याचे संघटनांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
हेही वाचा - अकोल्यात प्रथमच शॉर्ट फिल्म फेस्टिवल स्पर्धा
जोपर्यंत शासन काही ठोस भूमिक घेत नाही तो पर्यंत हा लढा सुरु ठेवण्याचा निर्धार या सर्व संघटनांच्यावतीने काढलेल्या एका संयुक्त पत्रकातून व्यक्त करण्यात आला आहे. या शाळा संघटनांनी रास्त मागण्यासाठी देखील आता आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागत असल्याबाबत खंतदेखील व्यक्त केली आहे.
संपादन - विवेक मेतकर
अकोला जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा
हेही वाचा -
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.