संग्रामपूर (बुलढाणा) : तालुक्यातील बोडखा येथील महादेव आगरकर यांच्या बोडखा शिवारात १५ एकर शेतावर परतीच्या पावसाने बहरलेले सोयाबीन झाडांना शेंगा भरल्याच नाही. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याची घोर निराशी झाली. सोयाबीन उत्पादन खर्च निघत नसून शेतक-यांनी 15 एकरातील नैराश्य पोटी उभ्या सोयाबीन पिकात ट्रक्टर रोट्याव्हेटर फिरविले. सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून आर्थिक विळख्यात सापडले.
हे ही वाचा : परतीच्या पावसापूर्वीच सिंचन प्रकल्प भरले
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देणे गरजेचे अशी मागणी यावेळी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. सोयाबीनच्या ७५% शेंगा पोकळ असल्याने तालुका खारपाण पट्ट्यात येत असून सोयाबीन उत्पादकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. शेतकऱ्यांना लावलेला खर्च निघत नसल्याचे वस्तुस्थिती असल्याने काळजावर दगळ ठेवून नैराश्य पोटी ट्रक्टर रोट्याव्हेटर फिरविले.
यावेळी भाजपा संग्रामपूर तालुकाध्यक्ष लोकेश राठी यांच्या नेतृत्वात प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्याला धीर देत राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आले. यावेळी तालुक्यातील बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते शेतात उपस्थित होते.
संपादन - सुस्मिता वडतिले
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.