t-v-mohandas-pai
t-v-mohandas-pai 
अर्थविश्व

आयटी क्षेत्रालाही मंदीचा फटका; हजारो नोकऱ्या जाण्याची भीती

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : विकासाची गती मंदावल्याने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) मध्यमस्तरावरील तब्बल 30 ते 40 हजार कर्मचाऱ्यांवर नोकरी गमावण्याची वेळ येऊ शकते, असे मत आयटीतज्ज्ञ आणि इन्फोसिसचे माजी मुख्य वित्त अधिकारी टी. व्ही. मोहनदास पै यांनी व्यक्त केले.

कोणत्याही क्षेत्रात प्रत्येक पाच वर्षांच्या काळात या प्रकारची परिस्थिती निर्माण होत असते, असेही ते म्हणाले. 

पाश्‍चिमात्य देशांप्रमाणे भारतातदेखील प्रत्येक पाच वर्षांच्या काळात एखादे औद्योगिक किंवा सेवाक्षेत्र एका संक्रमणावस्थेतून जात असते. त्यामुळे ही परिस्थिती अगदी सामान्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ज्या वेळी एखादी कंपनी झपाट्याने वाढत असते त्या वेळी कर्मचाऱ्यांना बढती किंवा पगारात मिळणारी वाढ स्वाभाविक असते. त्याचप्रमाणे जेव्हा कंपनी मंदीसदृश परिस्थितीतून जात असते किंवा तिच्या वाढण्याचा वेग मंदावतो त्या वेळी तुलनेने अधिक पगार घेणाऱ्या आणि कंपनीसाठी अनावश्‍यक ठरणाऱ्या मध्यमस्तरावरील कर्मचाऱ्यांवर नोकरी गमावण्याची वेळ येत असते. विविध प्रकारचे कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांना दुसरीकडे नोकरीच्या संधी सहज निर्माण होतात, असे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT