Astro Tips esakal
संस्कृती

Astro Tips : मंदिराच्या आत कधीच घेऊन जाऊ नका या वस्तू; पूजा होणार नाही मान्य

हिंदू धर्मात देवाचे निवास असलेले स्थान सर्वात पवित्र

सकाळ डिजिटल टीम

Astro Tips : हिंदू धर्मात देवाचे निवास असलेले स्थान सर्वात पवित्र मानले जाते. मंदिर, धर्मशाळा, देवाची समाधी या ठिकाणी दररोज पूजा केली जाते. त्यामूळे तिथे गेल्यावर तूम्हाला प्रसन्न वाटते. मंदिरात तूम्ही जेवढ्या भक्तीने आणि पवित्रतेने प्रवेश कराल तेवढे पुण्य प्राप्त होईल, अशी समजूत आहे. पण, तूम्ही मंदिरात नकळतपणे नेत असलेल्या काही वस्तूंमूळे देवता नाराज होऊ शकतात.

मंदिर आणि उपासनेशी संबंधित अनेक नियम आहेत. ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे जाणूनबुजून किंवा नकळत अशी कोणतीही चूक करू नका. ज्यामुळे तुमची पूजा व्यर्थ होईल.

आपण सर्वजण देवाच्या दर्शनासाठी आणि पूजा करण्यासाठी मंदिरात जातो. परंतु मंदिरात चामड्याच्या वस्तूंचा प्रवेश निषिद्ध आहे. चला जाणून घेऊया दिल्लीचे आचार्य गुरमीत सिंह जी यांच्याकडून जाणून घेऊयात. लेदरच्या कोणत्या वस्तू मंदिरात नेऊ नयेत आणि याचे कारण काय आहे.

मंदिराला देवाचे निवासस्थान म्हणतात. प्रत्येकजण देवाचे दर्शन आणि पूजा करण्यासाठी मंदिरात जातो. मंदिरात जाण्यापूर्वी, शरीर आणि मन शुद्ध करावे, म्हणजे स्नान करून आणि स्वच्छ कपडे परिधान केल्यानंतरच मंदिरात जावे. त्याचबरोबर मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी शूज आणि चप्पल, खाणेपिण्याच्या वस्तू, अशुद्ध वस्तू आणि चामड्याच्या वस्तू बाहेर ठेवाव्यात.

मंदिरात चामड्याच्या वस्तू आणण्यास का मनाई आहे?

पर्स, बेल्ट, बॅग, टोपी, जॅकेट इत्यादी वस्तू चामड्यापासून बनवलेल्या असतात. तुम्ही या महागड्या वस्तू उच्च दर्जासाठी, फॅशनसाठी किंवा गरजेसाठी वापरत असाल तरी या वस्तू घेऊन मंदिरात प्रवेश करू नका. या वस्तू मंदिरात नेल्याने मंदिराची शुद्धता आणि पावित्र्य खराब होते.

कारण मृत प्राण्यांच्या त्वचेपासून चामडे बनवले जाते. यासोबतच यामध्ये अनेक प्रकारची रसायनेही वापरली जातात. ज्यामुळे ते दुर्गंधीहीन होऊ शकतात. याशिवाय पूजा करतानाही चामड्यापासून बनवलेल्या वस्तू घालू नयेत.

चामड्याबद्दल वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे?

मृत प्राण्यांच्या कातडीपासून बनवल्या जात असल्यामुळे धार्मिकतेने चामड्याच्या वस्तू शुद्ध मानल्या जात नाहीत. तसेच, वैज्ञानिक दृष्टिकोनातून लेदर घालणे शरीरासाठी आणि त्वचेसाठी हानिकारक असल्याचे म्हटले आहे.

यामुळे रोग आणि जंतूंची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. कारण पाण्याने धुऊन लेदर साफ करता येत नाही. पाण्याच्या संपर्कात येताच लेदर खराब होते. अशा स्थितीत चामड्याच्या वस्तूंमध्ये असलेला घाम, धूळ आणि घाण यामुळे त्वचेशी संबंधित आजार होण्याची शक्यता वाढते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

Nepal Flood Alert : नेपाळच्या महापुरात नाशिकचे पर्यटक अडकले? जिल्हा प्रशासनाकडून तातडीने हेल्पलाइन क्रमांक जारी, पाहा लिंक आणि कंट्रोल रूम नंबर

‘I Love My बायको! रितेश असं बोलला तरी जेनिलिया रुसली, दोघांचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Marathi News Live Updates : बेरोजगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात भव्य रॅली

MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT