पति पत्नीच्या नातं हे एक पवित्र नात आहे. अनेकदा या नात्यात दुरावा निर्माण होतो. यासाठी अनेक प्रयत्न केले जातात मात्र त्याचा काहीही फायदा होत नाही. मात्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे पतिपत्नीच्या नात्यात दुरावा दूर करून गोडवा वाढवणारे एक व्रत असते. हे व्रत केल्याने नाते समृद्ध होते.आज कृष्ण पक्षाच्या द्वीतियेला हा व्रत करायचा आहे. या व्रताला अशून्यशयन व्रत असेही म्हणतात.
या व्रतामध्ये भगवान विष्णूची पुजा केली जाते. पती पत्नी मधील मतभेद दुर होऊन गोडवा निर्माण व्हावा यासाठी हा व्रत करणे गरजेचे आहे.आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्य दवीतीयेला हे व्रत सुरू करतात आणि आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या द्वीतीयेपर्यंत म्हणजेच आषाढ पासून आश्विन महिन्यांपर्यत दर महिन्याला कृष्ण पक्षाला हा व्रत करायचा असतो.
विशेष म्हणजे व्रत करणाऱ्या व्यक्तीने दिवसभर मौन पाळायचं असतो. मौन यासाठी की त्यांना जास्तीत जास्त भगवंताच स्मरण करता यावं.
भगवान विष्णूची आराधना करताना ‘गगनांगणसंदीप क्षीराब्धिमथनोद्भव । भामासित दिगाभोग रमानुज नमोस्तुते ॥’ या मंत्राचा जप करावा. या व्रताने तुमचे वैवाहीक जीवन फूलून येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.